शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

सदस्यांना निरोप देताना राज्यसभेत मोदी झाले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 06:48 IST

गुलाम नबी आझाद, शमशेर सिंह यांच्यासह चौघांना निरोप

नवी दिल्ली : राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार सदस्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, सभापती एम. व्यंकय्या नायडू आणि सभागृहाच्या सदस्यांनी भावी जीवनासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. राजकीय जीवन आणि सभागृहातील अनुभव या आधारावर ते जनकल्याण आणि देशाच्या विकासासाठी आपले योगदान देत राहतील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. आझाद यांच्यासोबत भाजपचे शमशेर सिंह मन्हास, पीडीपीचे मीर मोहम्मद फय्याज व नजीर अहमद लवाय यांचा कार्यकाळही समाप्त होत आहे. यावेळी मोदी आणि गुलाम नबी आझादही काही क्षणांसाठी भावूक झाले होते. आझाद यांच्यासोबतच्या आपल्या जुन्या मैत्रीचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, आझाद असे नेते आहेत जे आपल्या पक्षासह सभागृह आणि देशाची काळजी करत असतात. दोन्ही सभागृहांतील आझाद यांच्या कार्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, त्यांची विनम्रता, शांतता आणि देशासाठी काही करण्याची इच्छा कौतुकास्पद आहे. आझाद यांची ही कटिबद्धता त्यांना आगामी काळातही शांत बसू देणार नाही. त्यांचा अनुभवाचा देशाला लाभ होत राहील.  मोदी म्हणाले की, आझाद हे जेव्हा काश्मीरचे मुख्यमंत्री होते, तेव्हा आपण गुजरातचे मुख्यमंत्री होतो. त्यावेळी काश्मिरात अतिरेक्यांनी हल्ला केला होता. यात गुजरातचे काही पर्यटक मारले गेले होते. आझाद यांनी फोन करून आपल्याला याची माहिती दिली. कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आझाद यांनी गुजरातच्या त्या लोकांची काळजी घेतली.  यावेळी पंतप्रधान अतिशय भावूक झाले. त्यानंतरच्या भाषणात आझाद यांनाही आपले अश्रू आवरणे कठीण झाले. आझाद यांनी सांगितले की, त्यावेळी घटनेनंतर आपण विमानतळावर गेलो तेव्हा पीडित कुटुंबातील मुले माझ्याजवळ येऊन खूप रडले. हे दृश्य पाहून माझ्या तोंडून शद्ब निघाले की, या देशातून दहशतवाद समाप्त व्हायला हवा. आठवलेंनी दिली आझाद यांना ऑफर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी खास शैलीत आझाद यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, काँग्रेस तुम्हाला पुन्हा राज्यसभेवर संधी देणार नसेल तर आम्ही तयार आहोत. हे ऐकून आझाद यांना हसू आलं. हिंदुस्थानी मुस्लिम असल्याचा अभिमान गुलाम नबी आझाद म्हणाले की, मी नशिबवान आहे की, कधी पाकिस्तानात गेलो नाही. पण, मी जेव्हा तेथील परिस्थितीबाबत वाचतो, ऐकतो तेव्हा मला याचा अभिमान होतो की, आम्ही हिंदुस्थानी मुस्लिम आहोत. जगात जर कुणा मुस्लिमांना अभिमान असायला हवा, तर तो हिंदुस्थानी मुस्लिमांना असायला हवा. पाकिस्तानचा उल्लेख करून ते म्हणाले की, तिथे ज्या सामाजिक समस्या आहेत, त्या भारतात नाहीत. मी अशी प्रार्थना करतो की, या देशातून दहशतवाद समाप्त व्हावा. काश्मिरी पंडितांचा उल्लेख करून ते म्हणाले की, मी जेव्हा विद्यार्थीदशेत राजकारणात होतो, तेव्हा मला सर्वाधिक मते काश्मिरी पंडितांचीच मिळत होती. काश्मिरी पंडितांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी मोदी आणि शहा यांना केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGhulam Nabi Azadगुलाम नबी आझाद