शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

सदस्यांना निरोप देताना राज्यसभेत मोदी झाले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 06:48 IST

गुलाम नबी आझाद, शमशेर सिंह यांच्यासह चौघांना निरोप

नवी दिल्ली : राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार सदस्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, सभापती एम. व्यंकय्या नायडू आणि सभागृहाच्या सदस्यांनी भावी जीवनासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. राजकीय जीवन आणि सभागृहातील अनुभव या आधारावर ते जनकल्याण आणि देशाच्या विकासासाठी आपले योगदान देत राहतील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. आझाद यांच्यासोबत भाजपचे शमशेर सिंह मन्हास, पीडीपीचे मीर मोहम्मद फय्याज व नजीर अहमद लवाय यांचा कार्यकाळही समाप्त होत आहे. यावेळी मोदी आणि गुलाम नबी आझादही काही क्षणांसाठी भावूक झाले होते. आझाद यांच्यासोबतच्या आपल्या जुन्या मैत्रीचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, आझाद असे नेते आहेत जे आपल्या पक्षासह सभागृह आणि देशाची काळजी करत असतात. दोन्ही सभागृहांतील आझाद यांच्या कार्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, त्यांची विनम्रता, शांतता आणि देशासाठी काही करण्याची इच्छा कौतुकास्पद आहे. आझाद यांची ही कटिबद्धता त्यांना आगामी काळातही शांत बसू देणार नाही. त्यांचा अनुभवाचा देशाला लाभ होत राहील.  मोदी म्हणाले की, आझाद हे जेव्हा काश्मीरचे मुख्यमंत्री होते, तेव्हा आपण गुजरातचे मुख्यमंत्री होतो. त्यावेळी काश्मिरात अतिरेक्यांनी हल्ला केला होता. यात गुजरातचे काही पर्यटक मारले गेले होते. आझाद यांनी फोन करून आपल्याला याची माहिती दिली. कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आझाद यांनी गुजरातच्या त्या लोकांची काळजी घेतली.  यावेळी पंतप्रधान अतिशय भावूक झाले. त्यानंतरच्या भाषणात आझाद यांनाही आपले अश्रू आवरणे कठीण झाले. आझाद यांनी सांगितले की, त्यावेळी घटनेनंतर आपण विमानतळावर गेलो तेव्हा पीडित कुटुंबातील मुले माझ्याजवळ येऊन खूप रडले. हे दृश्य पाहून माझ्या तोंडून शद्ब निघाले की, या देशातून दहशतवाद समाप्त व्हायला हवा. आठवलेंनी दिली आझाद यांना ऑफर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी खास शैलीत आझाद यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, काँग्रेस तुम्हाला पुन्हा राज्यसभेवर संधी देणार नसेल तर आम्ही तयार आहोत. हे ऐकून आझाद यांना हसू आलं. हिंदुस्थानी मुस्लिम असल्याचा अभिमान गुलाम नबी आझाद म्हणाले की, मी नशिबवान आहे की, कधी पाकिस्तानात गेलो नाही. पण, मी जेव्हा तेथील परिस्थितीबाबत वाचतो, ऐकतो तेव्हा मला याचा अभिमान होतो की, आम्ही हिंदुस्थानी मुस्लिम आहोत. जगात जर कुणा मुस्लिमांना अभिमान असायला हवा, तर तो हिंदुस्थानी मुस्लिमांना असायला हवा. पाकिस्तानचा उल्लेख करून ते म्हणाले की, तिथे ज्या सामाजिक समस्या आहेत, त्या भारतात नाहीत. मी अशी प्रार्थना करतो की, या देशातून दहशतवाद समाप्त व्हावा. काश्मिरी पंडितांचा उल्लेख करून ते म्हणाले की, मी जेव्हा विद्यार्थीदशेत राजकारणात होतो, तेव्हा मला सर्वाधिक मते काश्मिरी पंडितांचीच मिळत होती. काश्मिरी पंडितांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी मोदी आणि शहा यांना केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGhulam Nabi Azadगुलाम नबी आझाद