शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

किमती वाढवणाऱ्या टायर कंपन्यांना 1500 कोटी रुपयांचा दंड, MRF लाही दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 09:03 IST

स्पर्धा आयोगाचा दणका

खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : संघटना करून टायरच्या किमती वाढविल्याबद्दल भारतीय स्पर्धा आयोगाने पाच टायर उत्पादक आणि ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एटीएमए) यांना १५०० कोटींचा दंड ठोठावला आहे. २०१८ मध्ये ऑल इंडिया टायर डीलर्स फेडरेशनने कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे दाखल केलेल्या तक्रारीत टायर उत्पादक कंपन्यांनी नैसर्गिक रबर आणि इतर कच्च्या मालाच्या किमती वाढल्याचे निमित्त करून टायर आणि ट्यूबच्या किमती वाढविल्या. तथापि, या कच्च्या मालाच्या किमतीत नंतर मोठ्या प्रमाणात कपात झाली, शिवाय उत्पादन शुल्क कमी झाले तरी टायरच्या किमती त्या प्रमाणात कमी केल्या नाहीत, असा आरोप करण्यात आला होता. टायर उद्योजक टायरच्या किमतीवर नियंत्रण ठेवत असल्याने नैसर्गिक रबरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचा फायदा ग्राहकांना दिला जात नव्हता. एमसीएने ही तक्रार स्पर्धा आयोगाकडे पाठवली. आयोगाच्या महासंचालकांनी या आरोपांची चौकशी केली.

चौकशीत टायर कंपन्या आणि असोसिएशनने बाजारातील टायरच्या किमती वाढवण्यासाठी, उत्पादन आणि पुरवठावर नियंत्रण ठेवण्यासाठी संघटना केली असल्याचे स्पष्ट झाले. आयोगाने २०१८ मध्ये पाच टायर उत्पादक कंपन्या आणि एटीएमए यांना स्पर्धा कायद्यांतर्गत दोषी धरले.या चौकशीला मद्रास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. हायकोर्टाच्या निर्देशानुसार आयोगाने आपले आदेश सीलबंद पाकिटात ठेवले. ६ जानेवारी २०२२ रोजी हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. टायर कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले. २८ जानेवारी २०२२ रोजी ते फेटाळण्यात आले. यानंतर आयोगाने २०१८ चा आदेश सार्वजनिक केला. दंडाव्यतिरिक्त आयोगाने या कंपन्यांना हे सर्व बंद करण्याचा आदेशदेखील दिला आहे.टायर कंपन्यांकडून घाऊक आणि किरकोळ किमतीची माहिती गोळा करण्यापासून स्वतःला दूर ठेवण्याच्या आदेशासह एटीएमएवरही ८.४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आकारलेला दंडअपोलो टायर्स :     ४२५.५३ कोटीएमआरएफ लिमिटेड :     ६२२.०९ कोटीसिएट लि. :     २५२.१६ कोटीजेके टायर :     ३०९.९५ कोटीबिर्ला टायर्स :     १७८.३३ कोटी

टॅग्स :Courtन्यायालयdelhiदिल्ली