शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोळशाची वाहतूक जलमार्गाने केल्यास १० हजार कोटींची बचत

By admin | Updated: November 29, 2015 17:40 IST

कोळशाची वाहतूक देशांतर्गत जलमार्गाने केल्यास वर्षाला १० हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे बोलताना दिली.

नवी दिल्ली : कोळशाची वाहतूक देशांतर्गत जलमार्गाने केल्यास वर्षाला १० हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे बोलताना दिली.देशातील १११ प्रमुख नद्यांना राष्ट्रीय जलमार्ग म्हणून मान्यता देण्याच्या विधेयकास संसदेच्या चालू अधिवेशनात मंजुरी मिळण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पीएचडी चेम्बर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या वार्षिक कार्यक्रमाला गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी संबोधित करताना ते म्हणाले, देशांतर्गत जलमार्गाच्या माध्यमाने सामग्रीसोबतच प्रवासी वाहतुकीसही प्रोत्साहन देता येईल. याशिवाय या मार्गाने केवळ कोळशाची वाहतूक केली तरी वर्षाला १०,००० कोटी रुपयांची बचत करता येणे शक्य आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)पर्यावरणस्नेही, स्वस्त माध्यमजलमार्ग हे वाहतुकीचे पर्यावरणस्नेही आणि स्वस्त माध्यम आहे. एका अश्वशक्तीने (एचपी) भूपृष्ठमार्गे १५० किलो, रेल्वेने ५०० किलो तर जलमार्गाने ४,००० किलो वजन वाहून नेता येते. त्याचप्रमाणे एक लिटर इंधनाने सडकमार्गे प्रतिकिमी २४ टन मालाची वाहतूक करता येते. दुसरीकडे एवढ्याच इंधनाने रेल्वेत प्रति किमी ८५ टन आणि जलमार्गे १०५ टन सामान वाहून नेणे शक्य आहे. याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.