शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

‘महागाई, बेरोजगारी आणि कृषी संकटाचे एकच मूळ’; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 14:22 IST

राहुल गांधी म्हणाले, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासोबतच काँग्रेस शासित राज्यांमध्ये आम्ही जनतेचे प्रश्न सोडवत आहोत.

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. महागाई, बेरोजगारी, कृषी संकट, चीनचा ताबा- या सर्वांचे मूळ एकच आहे. अहंकार, मित्रप्रेम आणि मोदी सरकारचे अपयश, अशा आशयाचे ट्विट राहुल गांधींनी करुन केंद्रावर टीका केली आहे.

दुसरीकडे राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेत शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि कुटुंबीयांना नोकऱ्या मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी लोकसभेत सरकारकडे केली आहे. यासोबतच त्यांनी लोकसभेत कृषी कायद्याविरोधी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची यादी सादर केली. 

'लोकसभेतून विरोधकांचा वॉकआउट'

आंदोलनादरम्यान पंजाबमधील 400 आणि हरियाणातील 70 शेतकऱ्यांची यादी सुपूर्द करताना ते म्हणाले की, पीडित शेतकरी कुटुंबांना भरपाई आणि रोजगार मिळावा, अशी माझी इच्छा आहे. तुमच्याकडे शेतकऱ्यांच्या मृत्यूची कोणतीही आकडेवारी नाही, आम्ही तुम्हाला नाव आणि पत्ता देत आहोत. त्यांची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे, अशी मागणी राहुल यांनी केली. पण, सत्ताधारी पक्षाकडून प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रसने सभात्याग केला. 

पंजाब सरकारकडे आकडेवारी

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले, शेतकरी आंदोलनात किती शेतकरी मरण पावले याची आकडेवारी सरकारकडे का नाही? पंजाब सरकारने 403 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई दिली आहे. 100 हून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. पंजाब सरकारकडे यादी आहे, तर भारत सरकारकडे का नाही? भारत सरकारने शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या आकडेवारीची पडताळणी करून त्या सर्वांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलन