शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘महागाई, बेरोजगारी आणि कृषी संकटाचे एकच मूळ’; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 14:22 IST

राहुल गांधी म्हणाले, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासोबतच काँग्रेस शासित राज्यांमध्ये आम्ही जनतेचे प्रश्न सोडवत आहोत.

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. महागाई, बेरोजगारी, कृषी संकट, चीनचा ताबा- या सर्वांचे मूळ एकच आहे. अहंकार, मित्रप्रेम आणि मोदी सरकारचे अपयश, अशा आशयाचे ट्विट राहुल गांधींनी करुन केंद्रावर टीका केली आहे.

दुसरीकडे राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेत शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि कुटुंबीयांना नोकऱ्या मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी लोकसभेत सरकारकडे केली आहे. यासोबतच त्यांनी लोकसभेत कृषी कायद्याविरोधी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची यादी सादर केली. 

'लोकसभेतून विरोधकांचा वॉकआउट'

आंदोलनादरम्यान पंजाबमधील 400 आणि हरियाणातील 70 शेतकऱ्यांची यादी सुपूर्द करताना ते म्हणाले की, पीडित शेतकरी कुटुंबांना भरपाई आणि रोजगार मिळावा, अशी माझी इच्छा आहे. तुमच्याकडे शेतकऱ्यांच्या मृत्यूची कोणतीही आकडेवारी नाही, आम्ही तुम्हाला नाव आणि पत्ता देत आहोत. त्यांची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे, अशी मागणी राहुल यांनी केली. पण, सत्ताधारी पक्षाकडून प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रसने सभात्याग केला. 

पंजाब सरकारकडे आकडेवारी

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले, शेतकरी आंदोलनात किती शेतकरी मरण पावले याची आकडेवारी सरकारकडे का नाही? पंजाब सरकारने 403 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई दिली आहे. 100 हून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. पंजाब सरकारकडे यादी आहे, तर भारत सरकारकडे का नाही? भारत सरकारने शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या आकडेवारीची पडताळणी करून त्या सर्वांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलन