शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

तरुण मतदारांची भूमिका निर्णायक!; पाच वर्षांत ६७ लाख नव्या मतदारांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 04:49 IST

राजस्थानात प्रत्यक्ष मतदानाला १९ दिवस शिल्लक राहिले आहेत. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते राबत आहेत. आपापल्या पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचावी यासाठी झटत आहेत.

- सुहास शेलार

जयपूर : राजस्थानात प्रत्यक्ष मतदानाला १९ दिवस शिल्लक राहिले आहेत. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते राबत आहेत. आपापल्या पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचावी यासाठी झटत आहेत. राजस्थानात सुमारे पावणेपाच कोटी मतदार असून, त्यातील १८ ते ४० वयाच्या मतदारांची संख्या ५३ टक्के आहे. राजस्थानात गेल्या पाच वर्षांत ६७ लाख ५३ हजार नवीन मतदारांची नोंद झाली. त्यामुळे या निवडणुकीत तरुण मतदारांची भूमिका निर्णायक राहील. ही मते आपल्याकडे खेचण्यासाठी पक्ष विविध क्लृप्त्या लढवित आहेत.भाजपाने तरुणांना आकृष्ट करण्याची जबाबदारी भाजयुमोकडे सोपविली आहे. महाविद्यालये व गावागावांत युवा मोर्चा नवमतदारांची संमेलने भरवित आहे. सरकारने राज्यात राबविलेल्या भामाशाह योजना, मुख्यमंत्री जल स्वावलंबन योजना, अन्नपूर्णा योजना, कौशल विकास योजना, ग्रामीण गौरव पथ योजना यांची माहिती संमेलनात देत आहेत. प्रत्येक बुथमधील नऊ तरुण कार्यकर्त्यांची विशेष समिती बनविली आहे. यात बुथ प्रमुख, एक महिला कार्यकर्ता, एक एससी, एक एसटी कार्यकर्ता, सोशल मीडियाप्रमुख, मन की बात प्रमुख, स्वच्छता प्रमुखांचा सामावेश आहे. ही मंडळी गावपातळीवर प्रचार करीत आहेत.भाजपाचे बडे नेतेही स्थानिक पातळीवर प्रचारावर भर देत आहेत. अजमेर दक्षिण मतदारसंघात महिला व बालकल्याण राज्यमंत्री अनिता भदेल यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क अभियान सुरू आहे. यात सरकारच्या विकासकामांची पत्रके वाटली जात आहेत. पुष्कर मतदारसंघात आ. सुरेश सिंह रावत यांनी ‘कमळ संदेश यात्रा’ काढली. भाजपाच्या तुलनेत काँग्रेस स्थानिक पातळीवर प्रचारात काहीशी मागे आहे. प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी सोशल सेलच्या माध्यमातून प्रचारावर भर दिला असला, तरी विश्लेषकांच्या मते हा प्रचार केवळ शहरांपुरताच आहे. ग्रामीण भागांत घरोघरी भेटी द्याव्या लागणार आहेत.सन २०११ च्या जनगणनेनुसार राजस्थानातील ७५.१ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागांत राहते. शहरी लोकसंख्या केवळ २४.९ टक्के आहे. त्यात ४४. २ टक्के लोकसंख्या अशिक्षित आहे. त्यामुळे काँग्रेसचे हे ‘सोशल’ अस्त्र ग्रामीण राजस्थानात पोहोचणे अशक्यच आहे.निवडणुकपूर्व सर्वेक्षणांनी काँग्रेसला बहुमताचा अंदाज वर्तविला असला, तरी गेल्या काही दिवसांत भाजपाने प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसने प्रचार पद्धतीत बदल करण्याची आणि नवी तंत्रे अवलंबिण्याची गरज आहे.राजेंविरुद्ध मानवेंद्रसिंहकाही मतदारसंघांतील सामने अतिशय रोमहर्षक होणार आहेत. मुख्यमत्री वसुंधरा राजे यांच्या विरोधात काँग्रेसने झालरापाटण मतदारसंघात मानवेंद्र सिंह यांना उभे केले आहे. दुसरीकडे काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा नेता ठरू शकणारे सचिन पायलट यांच्याविरोधात भाजपाने आता अचानक युनूस खान यांना उमेदवारी दिली आहे. मानवेंद्र सिंह हे भाजपाचे माजी खासदार असून, ते भाजपातर्फे विधानसभेवरही निवडून आले होते. त्यांनी भाजपामधून अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपाचे एके काळचे वरिष्ठ नेते व वाजपेयी मंत्रिमंडळातील संरक्षणमंत्री जसवंत सिंह यांचे ते पुत्र आहेत.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक