शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

बदलत्या काळात राज्यपालांची भूमिका अधिक महत्त्वाची - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 07:13 IST

देशात सहकारी आणि स्पर्धात्मक संघराज्यावर अधिक भर दिला जात असल्यामुळे राज्यपाल आणि नायब राज्यपाल यांची भूमिका महत्त्वाची बनली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी केले.

नवी दिल्ली : देशात सहकारी आणि स्पर्धात्मक संघराज्यावर अधिक भर दिला जात असल्यामुळे राज्यपाल आणि नायब राज्यपाल यांची भूमिका महत्त्वाची बनली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी केले.येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यपाल आणि नायब राज्यपालांच्या दोनदिवसीय परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कोविंद यांनी सांगितले की, देशातील सर्वच राज्यपालांना सार्वजनिक जीवनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्याचा जास्तीत जास्त लाभ देशातील जनतेला व्हायला हवा. राष्ट्रपती भवनाच्या वतीने अधिकृतरीत्या जारी करण्यात आलेल्या निवेदनात राष्ट्रपती कोविंद यांच्या भाषणाची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार कोविंद यांनी म्हटले की, आपण हल्ली सहकारी संघराज्य आणि निरोगी स्पर्धात्मक संघराज्य यावर भर देत आहोत. या पार्श्वभूमीवर राज्यपालांची  भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. सहकारी संघराज्य म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांनी परस्परविरोधी धोरणांऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेऊन एकसमान धोरणांवर काम करणे होय. स्पर्धात्मक संघराज्य म्हणजे राज्यांनी परस्परांशी, केंद्राशी स्पर्धा करणे होय.बांधिलकी...कोविंद यांनी सांगितले की, घटनेचे संरक्षण करणे एवढेच मर्यादित काम राज्यपालांचे नाही. आपल्या राज्यातील लोकांच्या सेवेत सातत्याने कार्यरत राहण्याशी त्यांची बांधिलकी आहे. अंतिमत: आपण सगळेच लोकांसाठी काम करतो. आपण लोकांना उत्तरदायीही आहोत.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदPresidentराष्ट्राध्यक्षIndiaभारत