शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

मोदींचे मिशन सरकारी नोकरी! 71000 तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप; पंतप्रधान म्हणाले,"तरुण सर्वात मोठी ताकद"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 12:43 IST

rojgar mela : गेल्या महिन्यात याच दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशीच 75 हजार नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले होते. 

नवी दिल्ली : 10 लाख तरुणांना सरकारी नोकरी (Sarkari Naukri) देण्यासाठी सुरु झालेल्या रोजगार मेळाव्याचे (Rojgar Mela) आयोजन करण्यात आले. यावेळी आजच्या रोजगार मेळाव्यातून हे दिसून येते की सरकारी नोकऱ्या देण्यासाठी सरकार मिशन मोडमध्ये कसे काम करत आहे. रोजगार मेळाव्याशी संबंधित सर्व तरुणांचे अभिनंदन, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. दरम्यान, आज 71 हजारांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रे दिली जात आहेत. गेल्या महिन्यात याच दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशीच 75 हजार नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले होते. 

या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,  केंद्र सरकार सरकारी नोकऱ्यांमध्ये रोजगार देण्यासाठी मिशन मोडवर काम करत आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांसह अनेक भाजपशासित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनीही असेच प्रयत्न केले आहेत. 28 नोव्हेंबर रोजी गोवा आणि त्रिपुरामध्ये अशाच प्रकारचा रोजगार मेळावा आयोजित केला जाईल. डबल इंजिन सरकार असण्याचा हा फायदा आहे.

देशाने अमृत काळात प्रवेश केला आहे, आम्ही भारताचा विकास करण्याचे वचन घेतले आहे. या वचनामध्ये तुम्ही सर्वजण सारथी बनणार आहात. सर्व निवडक तरुणांसाठी 'कर्मयोगी प्रारंभ' हा विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, उपस्थित जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत हे जगाचे उत्पादन केंद्र बनणार आहे. आमच्या सरकारने अंतराळ क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण करण्याची संधी दिली आहे, ज्यामध्ये ड्रोनद्वारे नोकऱ्यांचा समावेश आहे. देशातील तरुणांनी नव्या संधींचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतासारख्या तरुण देशात आमचे करोडो युवक या देशाची सर्वात मोठी ताकद आहेत. आपल्या तरुणांची प्रतिभा आणि उर्जा राष्ट्र उभारणीत वापरली जावी, ही केंद्र सरकारची सर्वात मोठी प्राथमिकता आहे. तसेच, सरकारने 'कर्मयोगी भारत' नावाचे तंत्रज्ञान मंच सुरू केले आहे. या प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारे ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध आहेत. या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या ऑनलाईन कोर्सेसचा त्यांनी जरूर लाभ घ्यावा. यामुळे कौशल्य तर वाढेलच, शिवाय भविष्यातील करिअरमध्येही खूप फायदा होईल, असे त्यांनी तरुणांना सांगितले. याशिवाय, आज भारत सेवा निर्यातीच्या बाबतीत जगातील एक मोठी शक्ती बनला आहे. लवकरच भारत उत्पादनाचे केंद्र बनेल, असा विश्वास तज्ज्ञांना आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन