शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

मागण्या मान्य होईपर्यंत रस्ता खुला करणार नाही; शाहीनबाग आंदोलकांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 14:07 IST

Shahin Baug: या कमिटीने शाहीन बागमधील आंदोलकांशी संवाद साधला, मार्ग खुला होऊ शकला नाही

नवी दिल्ली -  सीएएविरोधात शहरातील शाहीनबागमध्ये सुरु असणाऱ्या आंदोलनामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. याबाबत सुप्रीम कोर्टाकडून नियुक्त केलेल्या समितीने आपला अहवाल रिपोर्ट सुप्रीम कोर्टात सादर केला. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सुरु असलेले आंदोलन शाहीनबागेत शांततेत सुरु असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 

तीन जणांच्या कमिटीने सांगितले की, पोलिसांनी शाहीनबाग परिसरातील 5 मार्ग बंद केलेत. शाहीन बागेचा मार्ग खुला करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पाठवलेल्या तीन वार्ताहरांपैकी हबीबुल्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दोन सदस्यांची खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी घेणार आहे. या प्रकरणात संजय हेगडे आणि साधना रामचंद्रन यांनाही कमिटीत समावेश केला गेला आहे. 

या कमिटीने शाहीन बागमधील आंदोलकांशी संवाद साधला, मार्ग खुला होऊ शकला नाही. आंदोलकांनी सात मागण्या कमिटीसमोर ठेवतानाच जोपर्यंत सीएए मागे घेतला जात नाही तोवर रस्ता खुला करणार नाही अशी भूमिका घेतली. शाहीन बागेत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात गेल्या 2 महिन्यांहून अधिक काळ आंदोलन सुरू आहे. यामुळे नोएडा ते दिल्ली दरम्यान प्रवास करणाऱ्या कोट्यवधी लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती.

एक मार्ग खुला 70 दिवसांपासून धरणे आंदोलन करणाऱ्या शाहीन बागेत संध्याकाळी आंदोलकांनी कालिंदी कुंज क्रमांक 9 रस्ता रहदारीसाठी खुला केला. हा रस्ता सुरू झाल्यामुळे बाटला हाऊस, जैतपूर, जामिया नगर व होली फॅमिली हॉस्पिटलमधून फरीदाबादला जाणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. कालिंदी कुंज रोडमार्गे पुष्ता रोड फरीदाबादला सहज पोहोचता येईल, पण फरीदाबादहून दिल्लीला येणाऱ्या गाड्यांसाठी अडचणी तशाच आहेत 

शाहीन बागेतल्या आंदोलनाचा विषय जनजीवन ठप्प करण्याशी संबंधित असल्याचं न्यायालयानं याचिकेवरील सुनावणी दरम्यान म्हटलं. दिल्ली पोलिसांना प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश देत न्यायालयानं या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी २४ फेब्रुवारीची तारीख निश्चित केली. न्यायालयानं आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी वरिष्ठ वकील संजय हेगडे आणि साधना रामचंद्रन यांची नियुक्ती केली. शाहीन बाग परिसरात दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे रस्ता बंद असल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकMuslimमुस्लीम