शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रोड टॅक्स वाढविल्यामुळे नऊ राज्यांत कार महागल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 03:57 IST

आधीच मंदीने ग्रासलेल्या वाहन उद्योगाला नऊ राज्यांनी रोड टॅक्स वाढवून आणखी एक दणका दिला आहे.

मुंबई/नवी दिल्ली : आधीच मंदीने ग्रासलेल्या वाहन उद्योगाला नऊ राज्यांनी रोड टॅक्स वाढवून आणखी एक दणका दिला आहे. रोड टॅक्समध्ये वाढ झाल्यामुळे या राज्यांतील प्रवासी वाहनांच्या किमती वाढल्या असून, त्याचा परिणाम म्हणून वाहन विक्री आणखी घटली आहे.रोड टॅक्समध्ये वाढ करणाऱ्या राज्यांत पंजाब, केरळ, जम्मू-काश्मीर आणि बिहार यांचा समावेश आहे. मारुती सुझुकीच्या उपलब्ध आकडेवारीवरून असे दिसते की, रोड टॅक्स वाढल्यामुळे वाहनांच्या किमती ५ हजार ते ५७ हजार रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.सूत्रांनी सांगितले की, जम्मू-काश्मिरातील रोड टॅक्समुळे (९ टक्के) मारुती सुझुकीच्या आॅल्टो८०० कारची किंमत २२,९०० रुपयांनी वाढली आहे. सुरक्षा व उत्सर्जन नियमांच्या पालनासाठी गुंतवणूक करावी लागल्यामुळे गाडीची एकूण किंमत ६३ हजारांनी वाढली आहे. सियाजची किंमत ९८ हजारांनी वाढली आहे. याचा परिणाम म्हणून आॅल्टोची विक्री २७ टक्क्यांनी घसरली आहे.याशिवाय या वित्त वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत पंजाबात छोट्या कारची विक्री २८ टक्क्यांनी, बिहारात २७ टक्क्यांनी आणि उत्तराखंडमध्ये २६ टक्क्यांनी घसरली आहे.>अशाने वाहनांची विक्री घटणारचमारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी सांगितले की, आॅल्टोसारख्या गाड्यांच्या किमतीही ४५ ते ५० हजार रुपयांनी वाढवाव्या लागत असतील तर दुसरी काय अपेक्षा केली जाऊ शकते? विक्री घटणारच. विक्री आधीच कमी झालेली असताना राज्ये रोड टॅक्स ५ टक्क्यांपर्यंत वाढवीत आहेत. वाढलेल्या किमती, कर्ज सुविधांची अत्यल्प उपलब्धता आणि सुरुवातीला जमा कराव्या लागणाºया रकमेतील वाढ याचा एकत्रित परिणाम म्हणून कारच्या किफायतशीरपणावर परिणाम होणे अटळ आहे.