शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

भीषण अपघात! बिहारमध्ये ट्रकने 4 मजुरांना चिरडलं; तिघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 11:42 IST

एका ट्रकने चार जणांना चिरडले, त्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नवादा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बिहारच्या नवादा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. नवादा येथे एका ट्रकने चार जणांना चिरडले, त्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नवादा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना नवादा गया रोडवरील सोभिया कृषी फार्मजवळ केवट नगर येथे घडली. ट्रक गयाहून नवादा येथे येत होता, त्याच दरम्यान ही घटना घडली, यात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची अधिक माहिती देताना प्रद्युम्न या मजुराने सांगितले की, दररोज प्रमाणे सर्वजण नवादा येथे काम करण्यासाठी एकत्र जात होते. एकूण पाच जण एकत्र जात होते. त्याचवेळी नवादा रस्त्यावरून भाजीपाला भरलेले पिकअप वाहन गेलं. त्याला बाजारात जाण्याचा रस्ता विचारला. 

गयाच्या दिशेने येणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने सर्वांना चिरडलं आणि तिघांचा जागीच मृत्यू झाला. एक मजूर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मजूर केवट नगर येथील रहिवासी आहेत. मृतांमध्ये आकाश कुमार, समीर कुमार, प्रल्हाद चौहान यांचा समावेश असून ते सर्वजण पहाटे मंडीत कामासाठी जात होते. 

या घटनेनंतर संतप्त लोकांनी रास्ता रोको केला. घटनेनंतर शहर पोलीस आणि सदर बीडीओ घटनास्थळी पोहोचले. मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात आली आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :AccidentअपघातBiharबिहार