शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

Ram Mandir: "रामलला आले नाहीत, निवडणुका आल्या आहेत", मंत्री तेजप्रताप यांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 12:43 IST

विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थित सोमवारी रामलाचा अभिषेक सोहळा पार पडला.

नवी दिल्ली: तब्बल ५०० वर्षांची प्रतीक्षा संपली असून अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्री राम विराजमान झाले आहेत. विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थित सोमवारी रामललाचा अभिषेक सोहळा पार पडला. बॉलिवूडमधील कलाकार, उद्योजक, महंत, खेळाडू आणि राजकीय मंडळी यांची या कार्यक्रमासाठी लक्षणीय उपस्थिती होती. विरोधी पक्षांमधील नेत्यांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. मात्र अनेकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. यावरून राजकारण देखील तापले असून बिहारचे मंत्री तेजप्रताप यादव यांनी भाजपाला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.

बिहार सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ चिरंजीव तेजप्रताप यादव हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याबद्दल त्यांनी अलीकडेच एक विधान केले होते की, प्रभू श्री राम त्यांच्या स्वप्नात आले होते आणि त्यांनी अयोध्येत येणार नसल्याचे सांगितले होते. 

भाजपाला खोचक टोलादरम्यान, आता पुन्हा एकदा तेजप्रताप यांनी एक पोस्ट करून भाजपाला खोचक टोला लगावला आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले, "रामलला आले नाहीत, निवडणुका आल्या आहेत. आमच्या मनात, हृदयात आणि प्रत्येक कणात श्री राम आधीच विराजमान आहेत. सनातन धर्माच्या मान्यतेनुसार, प्रभू श्री राम हे भगवान विष्णूचा अवतार आहेत आणि भगवान विष्णूचा शेवटचा अलतार 'कल्की अवतार' याला कलियुगाच्या समाप्तीनंतर धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी परत येणे बाकी आहे. सियावर रामचंद्र की जय." 

भाजपावर हल्लाबोलखरं तर या पोस्टद्वारे तेजप्रताप यादव यांनी आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीकडे लक्ष वेधले आहे. नाव न घेता त्यांनी एकप्रकारे भाजपावर हल्लाबोल केला आहे. राम मंदिरावरून विरोधी पक्षातील नेते थेट भाजपाला लक्ष्य करत आहेत. राम मंदिर हा भाजपाने निवडणुकीसाठी बनवलेला मुद्दा असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. त्यावरून राजकारण सुरू आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरBiharबिहारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBJPभाजपाlok sabhaलोकसभा