शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

राजद म्हणजे ‘राष्ट्रीय जादू-टोणा पार्टी’

By admin | Updated: October 26, 2015 10:10 IST

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे ‘तांत्रिक’ आणि त्यांचा पक्ष ‘राष्ट्रीय जादूटोणा पार्टी’ आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लालूप्रसाद यादव यांच्यावर शरसंधान केले

छप्रा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे ‘तांत्रिक’ आणि त्यांचा पक्ष ‘राष्ट्रीय जादूटोणा पार्टी’ आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लालूप्रसाद यादव यांच्यावर शरसंधान केले. बिहारचा विकास न होण्यासाठी नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव हेच जबाबदार असल्याचा आरोपही मोदींनी केला. बिहारच्या छप्रा येथे आयोजित भाजपच्या निवडणूक प्रचार रॅलीला संबोधित करताना मोदी बोलत होते. यावेळी मोदी यांनी बिहारच्या विकासासाठी सहासूत्री कार्यक्रम सादर केला. युवा आणि दुर्बल घटकांच्या लोकांचा विकास करण्याची ग्वाही त्यात दिली आहे. विकासाच्या मुद्यावर भर देताना मोदी यांनी वीज, पाणी, रस्ते आणि राज्याच्या प्रत्येक कुटुंबाला उत्पन्न, शिक्षण आणि औषध उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.‘लालूजी तुम्ही काळ्या वा पांढऱ्या कबुतराचा बळी देणे वा धूर सोडणे आणि धूळ उडविण्यासाठी मोकळे आहात. तुम्हाला जर असेच करायचे असेल तर तुम्ही आपल्या पक्षाचे नाव राष्ट्रीय जनता दलऐवजी राष्ट्रीय जादूटोणा पार्टी असे ठेवले पाहिजे आणि पक्षप्रमुख या नात्याने मग तुम्ही जगातील सर्वांत मोठे तांत्रिक बनाल. लोकशाही जनतेच्या आशीर्वादाने चालते, तांत्रिकाच्या तंत्रमंत्राने नाही. अठराव्या शतकातील मानसिकता असलेली व्यक्ती बिहारचा विकास करू शकते काय? अशा लोकांना बिहारबाहेर घालवा, असे आवाहन मोदी यांनी यावेळी केले.बचाव करणे अवघडभागवत यांनी आरक्षण धोरणाचा फेरविचार करण्याची भूमिका मांडल्याने आम्हाला बचाव करणे अवघड झाले आहे. त्यात व्ही.के.सिंग यांनी दलितांबद्दल केलेल्या विधानाची भर पडली आहे. या दोघांच्या विधानांमुळे आम्हाला स्पष्टीकरण देताना दबाव आला आहे. काही वेळा अडचणीची स्थिती निर्माण झाली आहे, अशी कबुली मांझी यांनी एका कार्यक्रमात दिली. (वृत्तसंस्था)> बिहारच्या युवकांना रोजीरोटीसाठी राज्याबाहेर पलायन करण्यास बाध्य करून ‘बाहेरचे’ कुणी बनविले, हे परमआदरणीय लोकशाहीवादी नितीशजी आणि सर्वांत मोठे तांत्रिक लालूजींना मी विचारू इच्छितो.’ते म्हणाले, ‘राज्याच्या सर्व समस्यांसाठी बडे भाई (लालूप्रसाद) आणि छोटे भाई (नितीशकुमार) जबाबदार आहेत. केवळ रालोआच राज्याचा विकास करू शकते. बिहारच्या युवकांना बेरोजगारीमुळेच राज्याबाहेर पलायन करावे लागत आहे.>>वादांमुळे रालोआवर दबाव - मांझींचा घरचा अहेर पाटणा :

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा समोर असताना रालोआ दबावाखाली आल्याचे सांगत हिंदुस्तान अवाम मोर्चाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी घरचा अहेर दिला आहे. विशेषत: सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाचा फेरविचार करण्याची केलेली मागणी, तसेच हरियाणातील फरिदाबाद येथे दलिताचे घर पेटवून देण्यात आल्याबद्दल राज्यमंत्री व्ही.के.सिंग यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाकडे त्यांनी लक्ष वेधले.>>पंतप्रधानांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोपनवी दिल्ली : पुढच्या वर्षापासून केंद्रातील कनिष्ठ पदांसाठी मुलाखतीची गरज राहणार नाही, अशी घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. यामागे आरक्षण धोरण संपविण्याचा कट आहे, असा स्पष्ट आरोप बिहारमधील महाआघाडीचे घटक पक्ष असलेले संयुक्त जनता दल आणि काँग्रेसने केला आहे. बिहार विधानसभा निवडणूक घेतली जात असताना मोदींनी ही घोषणा केली. मोदींच्या या घोषणेमुळे ‘आरक्षण धोरणाचा फेरविचार केला पाहिजे,’ या रा. स्व. संघप्रमुख मोहन भागवत यांच्या आवाहनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा होईल, असे संजदचे सरचिटणीस त्यागी यांनी म्हटले आहे.