शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

राजद म्हणजे ‘राष्ट्रीय जादू-टोणा पार्टी’

By admin | Updated: October 26, 2015 10:10 IST

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे ‘तांत्रिक’ आणि त्यांचा पक्ष ‘राष्ट्रीय जादूटोणा पार्टी’ आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लालूप्रसाद यादव यांच्यावर शरसंधान केले

छप्रा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे ‘तांत्रिक’ आणि त्यांचा पक्ष ‘राष्ट्रीय जादूटोणा पार्टी’ आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लालूप्रसाद यादव यांच्यावर शरसंधान केले. बिहारचा विकास न होण्यासाठी नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव हेच जबाबदार असल्याचा आरोपही मोदींनी केला. बिहारच्या छप्रा येथे आयोजित भाजपच्या निवडणूक प्रचार रॅलीला संबोधित करताना मोदी बोलत होते. यावेळी मोदी यांनी बिहारच्या विकासासाठी सहासूत्री कार्यक्रम सादर केला. युवा आणि दुर्बल घटकांच्या लोकांचा विकास करण्याची ग्वाही त्यात दिली आहे. विकासाच्या मुद्यावर भर देताना मोदी यांनी वीज, पाणी, रस्ते आणि राज्याच्या प्रत्येक कुटुंबाला उत्पन्न, शिक्षण आणि औषध उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.‘लालूजी तुम्ही काळ्या वा पांढऱ्या कबुतराचा बळी देणे वा धूर सोडणे आणि धूळ उडविण्यासाठी मोकळे आहात. तुम्हाला जर असेच करायचे असेल तर तुम्ही आपल्या पक्षाचे नाव राष्ट्रीय जनता दलऐवजी राष्ट्रीय जादूटोणा पार्टी असे ठेवले पाहिजे आणि पक्षप्रमुख या नात्याने मग तुम्ही जगातील सर्वांत मोठे तांत्रिक बनाल. लोकशाही जनतेच्या आशीर्वादाने चालते, तांत्रिकाच्या तंत्रमंत्राने नाही. अठराव्या शतकातील मानसिकता असलेली व्यक्ती बिहारचा विकास करू शकते काय? अशा लोकांना बिहारबाहेर घालवा, असे आवाहन मोदी यांनी यावेळी केले.बचाव करणे अवघडभागवत यांनी आरक्षण धोरणाचा फेरविचार करण्याची भूमिका मांडल्याने आम्हाला बचाव करणे अवघड झाले आहे. त्यात व्ही.के.सिंग यांनी दलितांबद्दल केलेल्या विधानाची भर पडली आहे. या दोघांच्या विधानांमुळे आम्हाला स्पष्टीकरण देताना दबाव आला आहे. काही वेळा अडचणीची स्थिती निर्माण झाली आहे, अशी कबुली मांझी यांनी एका कार्यक्रमात दिली. (वृत्तसंस्था)> बिहारच्या युवकांना रोजीरोटीसाठी राज्याबाहेर पलायन करण्यास बाध्य करून ‘बाहेरचे’ कुणी बनविले, हे परमआदरणीय लोकशाहीवादी नितीशजी आणि सर्वांत मोठे तांत्रिक लालूजींना मी विचारू इच्छितो.’ते म्हणाले, ‘राज्याच्या सर्व समस्यांसाठी बडे भाई (लालूप्रसाद) आणि छोटे भाई (नितीशकुमार) जबाबदार आहेत. केवळ रालोआच राज्याचा विकास करू शकते. बिहारच्या युवकांना बेरोजगारीमुळेच राज्याबाहेर पलायन करावे लागत आहे.>>वादांमुळे रालोआवर दबाव - मांझींचा घरचा अहेर पाटणा :

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा समोर असताना रालोआ दबावाखाली आल्याचे सांगत हिंदुस्तान अवाम मोर्चाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी घरचा अहेर दिला आहे. विशेषत: सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाचा फेरविचार करण्याची केलेली मागणी, तसेच हरियाणातील फरिदाबाद येथे दलिताचे घर पेटवून देण्यात आल्याबद्दल राज्यमंत्री व्ही.के.सिंग यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाकडे त्यांनी लक्ष वेधले.>>पंतप्रधानांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोपनवी दिल्ली : पुढच्या वर्षापासून केंद्रातील कनिष्ठ पदांसाठी मुलाखतीची गरज राहणार नाही, अशी घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. यामागे आरक्षण धोरण संपविण्याचा कट आहे, असा स्पष्ट आरोप बिहारमधील महाआघाडीचे घटक पक्ष असलेले संयुक्त जनता दल आणि काँग्रेसने केला आहे. बिहार विधानसभा निवडणूक घेतली जात असताना मोदींनी ही घोषणा केली. मोदींच्या या घोषणेमुळे ‘आरक्षण धोरणाचा फेरविचार केला पाहिजे,’ या रा. स्व. संघप्रमुख मोहन भागवत यांच्या आवाहनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा होईल, असे संजदचे सरचिटणीस त्यागी यांनी म्हटले आहे.