शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सहा महिन्यातच 'बायको नकुशी', लालूप्रसादांच्या मुलाला हवा घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 21:16 IST

ऐश्वर्या आणि तेज प्रताप यांच्या वैवाहिक जीवनात कलह निर्माण झाला आहे. त्यामुळे तेज प्रताप यादव यांनी थेट घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे

पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेज प्रताप यादव यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. पत्नी ऐश्वर्या राय यांच्यापासून घटस्फोट मिळावा, यासाठी पाटणा येथील दिवाणी न्यायालयात तेज प्रताप यांनी अर्ज केल्याची माहिती आहे. त्यानंतर, तेज प्रताप रांची येथे लालू प्रसाद यादव यांना भेटण्यासाठी गेले होते. विशेष म्हणजे तेज प्रताप यांच्या लग्नाला केवळ सहाच महिन्यांचा कालावधी झाला आहे. या घटस्फोटाबाबत अद्याप कुठलेही कारण देण्यात आले नाही.

ऐश्वर्या आणि तेज प्रताप यांच्या वैवाहिक जीवनात कलह निर्माण झाला आहे. त्यामुळे तेज प्रताप यादव यांनी थेट घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. याबाबत माहिती मिळताच, ऐश्वर्या यांचे वडिल आणि बिहारचे माजी मंत्री चंद्रिका राय यांनी लालू प्रसाद यादव यांचे घर गाठले. तसेच घटस्फोटाच्या निर्णयाबाबत चर्चाही केल्याचे समजते. विशेष म्हणजे याच वर्षी 12 मे रोजी धुमधडाक्यात तेज प्रताप यांचा विवाह झाला होता. मात्र, सहा महिन्यांतच दोघांच्या नात्यामध्ये कटुता निर्माण झाली. मी ऐश्वर्यासोबतच नातं पुढे नेऊ इच्छित नसल्याचे तेजप्रताप यांनी म्हटलं आहे. दरम्यान, लालूप्रसाद यादव सध्या रांचीतील राजेंद्र इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथील पेईंग वॉर्डमध्ये आहेत. चारा घोटाळाप्रकरणी ते शिक्षा भोगत आहेत.

टॅग्स :Tej Pratap Yadavतेज प्रताप यादवLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहारCourtन्यायालय