शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

“लोकसभा निवडणूक पराभूत झाल्यावर PM मोदी कायमचे परदेशात निघून जातील”: लालू प्रसाद यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 13:13 IST

NDA Vs INDIA: नरेंद्र मोदी संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आम्ही हा प्रयत्न हाणून पाडू, असा विश्वास लालू प्रसाद यादव यांनी व्यक्त केला आहे.

NDA Vs INDIA: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी NDA आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. भाजपविरोधी पक्षांनी आपल्या नव्या आघाडीला INDIA असे नाव दिले आहे. विरोधकांना चितपट करत शक्तिप्रदर्शन करण्यासाठी NDA नेही कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांचा पराभव करणार असल्याचा विश्वास विरोधक व्यक्त करत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विरोधकांच्या INDIA आघाडीवर टीका केली. स्वतंत्र्यलढ्याच्या चळवळीला जेव्हा चांगलीच गती मिळाली होती, तेव्हा महात्मा गांधी यांनी ‘क्विट इंडिया’ म्हणजेच भारत छोडोची घोषणा दिली होती. या घोषणेमुळे देशातील लोकांना प्रेरणा मिळाली होती. देशाच्या कल्याणासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी या घोषणेची आता पुन्हा एकदा गरज आहे. या घोषणेला गावकुसापर्यंत घेऊन जाण्याची गरज आहे. इंग्रजांनो भारत सोडून जा, असे महात्मा गांधी तेव्हा म्हणाले होते. अशाच प्रकारे आजदेखील भ्रष्टाचार क्विट इंडिया, घराणेशाही क्विट इंडिया, अशी घोषणा देण्याची गरज आहे. क्विट इंडियाच भारताला वाचवू शकेल. विरोधकांच्या ‘इंडिया’ नावाने समोर आलेल्या आघाडीला पराभूत करण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. याला आता राजद पक्षाचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

PM मोदी कायमचे परदेशात निघून जातील

नरेंद्र मोदी यांना २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पराभूत होण्याची भीती आहे. या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर तेच भारताच्या बाहेर जाऊन वास्तव्य करणार आहेत. नरेंद्र मोदी भारत सोडून जाण्याचा विचार करत आहेत. याच कारणामुळे ते अनेक देशांच्या भेटी घेत आहेत. पिझ्झा, मोमोज यासारख्या पदार्थांचा मनमुराद आनंद लुटता यावा, असे ठिकाण ते राहण्यासाठी शोधत आहेत, असा खोचक टोला लालू प्रसाद यादव यांनी लगावला. 

दरम्यान, मुंबईत विरोधकांच्या इंडिया आघाडीची महत्त्वाची तिसरी बैठक होणार आहे. या बैठकीची वाट पाहात असून, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह मुंबईतील बैठकीला येणार असल्याचे लालू प्रसाद यादव यांनी सांगितले. नरेंद्र मोदी संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आम्ही हा प्रयत्न हाणून पाडू. एकजूट कायम ठेवत भाजपचा पराभव केला पाहिजे, असे आवाहन लालू प्रसाद यादव यांनी केले.

 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवNarendra Modiनरेंद्र मोदी