शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

“लोकसभा निवडणूक पराभूत झाल्यावर PM मोदी कायमचे परदेशात निघून जातील”: लालू प्रसाद यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 13:13 IST

NDA Vs INDIA: नरेंद्र मोदी संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आम्ही हा प्रयत्न हाणून पाडू, असा विश्वास लालू प्रसाद यादव यांनी व्यक्त केला आहे.

NDA Vs INDIA: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी NDA आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. भाजपविरोधी पक्षांनी आपल्या नव्या आघाडीला INDIA असे नाव दिले आहे. विरोधकांना चितपट करत शक्तिप्रदर्शन करण्यासाठी NDA नेही कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांचा पराभव करणार असल्याचा विश्वास विरोधक व्यक्त करत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विरोधकांच्या INDIA आघाडीवर टीका केली. स्वतंत्र्यलढ्याच्या चळवळीला जेव्हा चांगलीच गती मिळाली होती, तेव्हा महात्मा गांधी यांनी ‘क्विट इंडिया’ म्हणजेच भारत छोडोची घोषणा दिली होती. या घोषणेमुळे देशातील लोकांना प्रेरणा मिळाली होती. देशाच्या कल्याणासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी या घोषणेची आता पुन्हा एकदा गरज आहे. या घोषणेला गावकुसापर्यंत घेऊन जाण्याची गरज आहे. इंग्रजांनो भारत सोडून जा, असे महात्मा गांधी तेव्हा म्हणाले होते. अशाच प्रकारे आजदेखील भ्रष्टाचार क्विट इंडिया, घराणेशाही क्विट इंडिया, अशी घोषणा देण्याची गरज आहे. क्विट इंडियाच भारताला वाचवू शकेल. विरोधकांच्या ‘इंडिया’ नावाने समोर आलेल्या आघाडीला पराभूत करण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. याला आता राजद पक्षाचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

PM मोदी कायमचे परदेशात निघून जातील

नरेंद्र मोदी यांना २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पराभूत होण्याची भीती आहे. या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर तेच भारताच्या बाहेर जाऊन वास्तव्य करणार आहेत. नरेंद्र मोदी भारत सोडून जाण्याचा विचार करत आहेत. याच कारणामुळे ते अनेक देशांच्या भेटी घेत आहेत. पिझ्झा, मोमोज यासारख्या पदार्थांचा मनमुराद आनंद लुटता यावा, असे ठिकाण ते राहण्यासाठी शोधत आहेत, असा खोचक टोला लालू प्रसाद यादव यांनी लगावला. 

दरम्यान, मुंबईत विरोधकांच्या इंडिया आघाडीची महत्त्वाची तिसरी बैठक होणार आहे. या बैठकीची वाट पाहात असून, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह मुंबईतील बैठकीला येणार असल्याचे लालू प्रसाद यादव यांनी सांगितले. नरेंद्र मोदी संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आम्ही हा प्रयत्न हाणून पाडू. एकजूट कायम ठेवत भाजपचा पराभव केला पाहिजे, असे आवाहन लालू प्रसाद यादव यांनी केले.

 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवNarendra Modiनरेंद्र मोदी