शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

RJD-काँग्रेसने गरिबांच्या हक्कांवर डाका टाकला, जनावरांचा चारा खाणारे..; सीएम योगींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 15:46 IST

'भगवान रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा काँग्रेसचा राजपुत्र आता छठमैयावरही प्रश्न उपस्थित करतोय'

समस्तीपूर : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज भाजप उमेदवार राजेश कुमार सिंह यांच्या समर्थनार्थ मोहीउद्दीननगर येथे झालेल्या सभेतून विरोधकांवर तीव्र टीका केली. योगींनी राजद-काँग्रेस आघाडीवर हल्ला करताना म्हटले, “गरीबांच्या हक्कांवर डाका टाकणारे, जनावरांचा चारा खाणारे लोक बिहारचे भले कधीच करू शकत नाहीत. या लोकांनी बिहारला ‘जंगलराज’मध्ये ढकलले, अपहरण उद्योग चालवला, दंगे घडवले आणि नरसंहार केला.”

रामद्रोही आणि छठद्रोही विरोधक 

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, “काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून म्हटले की, ‘राम अस्तित्वातच नव्हते’. राजदने रामरथ रोखला, तर समाजवादी पक्षाने रामभक्तांवर गोळ्या झाडल्या. हेच लोक आता छठमैयावर प्रश्न उपस्थित करत आहेत. अशा लोकांकडून ‘संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान’ होतो आणि बिहारच्या ओळखीला कलंक लागतो. 2005 पूर्वी राजद-काँग्रेसने युवकांच्या रोजगारावर डाका टाकला, गरीबांना मूलभूत सुविधा नाकारल्या. तेव्हा गरीब आजारी पडला की, उपचाराअभावी मरत असे. पशुधनाचा चारा खाणारे गरीबांचा कधी विचार करणार? त्यांनी जातीय सेना उभी करून नरसंहार करवले, अपहरण उद्योग फोफावला आणि महिलांच्या सुरक्षेची पायमल्ली केली.”

उत्तर प्रदेशचा बुलडोझर थांबणारा नाही

योगींनी समाजवादी पक्षावर टोला लगावत म्हटले, “उत्तर प्रदेशची जनता ज्यांना वारंवार नाकारते, तेच आता बिहारमध्ये भाषण देतात. आम्ही फक्त नावच नाही बदलले, आम्ही कामगिरीने उत्तर प्रदेशचs नाव पुन्हा जगाच्या नकाशावर आणलं आहे. अयोध्येत राममंदिर बांधले, काशी विश्वनाथ धाम उभारले, प्रयागराजचा भव्य महाकुंभ आयोजित केला. आता माफियांना चिरडण्यासाठी आमचा ‘बुलडोझर’ चालतो आणि त्यांच्या संपत्तीचा उपयोग गरीबांच्या कल्याणासाठी केला जातो,” अशी टीकाही योगींनी केली.

भाजपच्या कामाचे कौतुक

योगींनी स्पष्ट केले की, “उत्तर प्रदेशचा बुलडोझर थांबणार नाही, तो घाबरणारही नाही. बिहारलाही माफियांविरुद्ध तसाच निर्धार दाखवावा लागेल.” योगींनी एनडीए सरकारच्या विकासकामांची स्तुती करत सांगितले की, “एनडीएच्या काळात बिहारमध्ये वैद्यकीय शिक्षण संस्थांची संख्या वाढली आहे. आज बिहारमध्ये 41 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये कार्यरत आहेत. 12 कोटी गरीबांना स्वच्छ इंधन म्हणून मोफत गॅस कनेक्शन मिळाले, 4 कोटींना घरे, 3 कोटींना मोफत वीजकनेक्शन मिळाले.”

त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत सांगितले की, “1 कोटी 41 लाख मातांना व बहिणींना थेट आर्थिक मदत दिली गेली आहे. ही तर केवळ सुरुवात आहे. गुलामीचे अवशेष मिटवण्यासाठी आता मोहीउद्दीननगरचे नाव ‘मोहननगर’ करण्याच्या दिशेने पाऊल उचला. आम्ही फैजाबादचे नाव अयोध्या केले, इलाहाबादचे नाव प्रयागराज, हीच आमची विकास आणि वारशाचा सन्मानाची ओळख आहे.”

English
हिंदी सारांश
Web Title : Yogi slams RJD-Congress for corruption, appeasement, and neglecting the poor.

Web Summary : Yogi Adityanath accused RJD-Congress of corruption, jungle raj, and neglecting the poor in Bihar. He criticized them for opposing Ram and neglecting Chhath Puja, while praising NDA's development work and women's empowerment initiatives.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५yogi adityanathयोगी आदित्यनाथcongressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल