शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
9
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
10
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
11
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
12
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
13
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
14
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
15
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
16
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
17
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
18
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
19
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
20
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?

जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूर

By admin | Updated: July 30, 2014 00:21 IST

संततधार : इगतपुरी तालुक्यात विक्रम; पालखेडचा साठा वाढला

जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूरसंततधार : इगतपुरी तालुक्यात विक्रम; पालखेडचा साठा वाढलानाशिक : गेल्या ४८ तासांत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे छोट्या मोठ्या नदी, नाल्यांना पूर आला आहे. इगतपुरी तालुक्यात विक्रमी पाऊस झाला असून, अनेक गावांचा घोटीशी संपर्क तुटला आहे. भावली धरण परिसरात सर्वाधिक पाऊस झाला आहे. दिंडोरी तालुक्यात धामण, कोळवण या नद्यांना पूर आला आहे. सिन्नर तालुक्यात म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहत आहे. घोटी/इगतपुरी : इगतपुरी तालुक्याच्या घाटमाथ्यासह पश्चिम भागात गेल्या ४८ तासांपासून पावसाची हजेरी कायम आहे. तालुक्याच्या भावली धरण परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, सर्वात कमी पावसाची नोंद पूर्वभागात झाली आहे. पावसामुळे दारणा नदीला पूर आला असून, पुरामुळे नदीलगतची भात शेती पाण्याखाली गेली आहे. घोटीजवळील काळुस्ते रस्त्यावरील दारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेला असल्याने चौदा गावांचा घोटी शहराशी संपर्क तुटला आहे.घाटमाथा व पश्चिम पट्ट्यात पाऊस कोसळत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. दारणा नदीचे उगमस्थान असलेल्या भावली धरण परिसरात चोवीस तासांत ४१५ मि.मी. पावसाची विक्रमी नोंद झाली. दारणा नदीला पूर आला आहे. पुरामुळे चौदा गावांच्या रहदारीचा काळुस्ते पूल पाण्यात गेल्याने काळुस्ते, कांचनगाव, औचितवाडी, शेणवड बु., खडकवाडी, तळोघ, जुन्हावने, भरवज, निरपण, कुरुंगवाडी, मांजरगाव, बोरवाडी, दरेवाडी, सारुक्तेवाडी आदि गावांचा घोटीशी संपर्क तुटला आहे. घोटी वैतरणा रस्त्यावर नवीन वाकी खापरी धरणात या वर्षापासून पाण्याचा साठा केल्याने धरणाचे पाणी कोरपगाव व भावली गावाजवळील रस्त्यावर आले असून, हा रस्ता पाण्याखाली गेल्याने पन्नासहून अधिक गावांचा घोटी शहराशी संपर्क तुटला आहे. तालुक्यातील पूर्वभागातील सर्वतीर्थ टाकेद ते आधारवड रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने या भागातील जनतेचा संपर्क तुटला.प्रशासन सज्जनिर्माण झालेली आपत्कालीन स्थिती लक्षात घेता यावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज असून, तहसीलदार महेंद्र पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी पट्टीचे पोहणारे, जीवरक्षक जवान तैनात केले आहेत.सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे परिसरातील बंधारे भरले आहे. एकीकडे म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहत असली तरी उंबरदरी धरण क्षेत्रात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस नसल्याने धरणातील पाणीसाठ्यात म्हणावी तितकी वाढ झालेली नाही. ठाणगाव पट्ट्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. यावर्षीही पावसाळा सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही या भागात पावसाने हजेरी लावली नव्हती. अधूनमधून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी येत दिंडोरी येथील धामण नदीला आलेला पूर.होत्या; मात्र त्यामुळे म्हाळुंगी नदीला पाणी आले नव्हते. अकोले तालुक्यातील विश्रामगड परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने म्हाळुंगी नदीला पाणी वाहू लागले आहे. ठाणगाव परिसरातही गेल्या दोन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. दिंडोरी :ङ्क्तशहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, विविध नदी-नाल्यांना पूर आला आहे. धरण क्षेत्रात दमदार पावसाच्या हजेरीने पाणी साठ्यातही वाढ होत असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाने उशिरा का होईना हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. पंधरा दिवसापासून अधून मधून रिपरिप सुरू होती.समाधानकारक पाऊस झाल्याने भाजीपाला लागवड सुरु होणार आहे