शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

ब्यूटी विद ब्रेन! IAS अधिकारी झाली मिसेस इंडिया; एकेकाळी वृत्तपत्र घेण्यासाठी नव्हते पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 15:57 IST

नातेवाईकांनी ऋतू सुहास यांच्या निर्णयाला विरोध केला कारण महिलांनी घराबाहेर जाऊन काम करणं ही चांगली गोष्ट मानली जात नव्हती. मात्र त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही आणि सरकारी नोकरीसाठी तयारी सुरू ठेवली.

मनात इच्छाशक्ती असेल तर अनेक गोष्टी सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. ऋतू सुहास यांनी कठोर परिश्रम घेऊन UP PCS सारखी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सौंदर्य स्पर्धा मिसेस इंडियाचा किताबही जिंकला.  ऋतू सुहास या IAS अधिकारी असून त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते.

ऋतू सुहास यांचा जन्म १६ एप्रिल १९७६ रोजी लखनौमध्ये झाला. त्यांचे वडील आरपी शर्मा लखनौ उच्च न्यायालयात वकील होते. शालेय शिक्षण नवयुग गर्ल्स कॉलेजमधून झाले. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. २००३ मध्ये आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यासाठी तयारी सुरू केली. 

नातेवाईकांनी ऋतू सुहास यांच्या निर्णयाला विरोध केला कारण त्यावेळी महिलांनी घराबाहेर जाऊन काम करणं ही चांगली गोष्ट मानली जात नव्हती. मात्र त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही आणि सरकारी नोकरीसाठी तयारी सुरू ठेवली. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्याकडे वर्तमानपत्र घेण्यासाठीही पैसे नव्हते.

पैसे मिळावे म्हणून त्यांनी लहान मुलांची शिकवणी घ्यायला सुरुवात केली. अखेर त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं आणि २००४ मध्ये ऋतू सुहास यांनी पीसीएसची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांची पहिली पोस्टिंग मथुरा येथे एसडीएम म्हणून झाली. यानंतर आग्रा, हाथरस आणि सोनभद्र इत्यादी अनेक ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली.

ऋतू सुहास यांना चांगल्या कामासाठी सरकारने गौरविले आहे. त्यांच्या क्षमतेमुळे त्यांना पीसीएस ते आयएएस अधिकारी म्हणून बढती मिळाली. २००८ मध्ये आयएएस अधिकारी सुहास एल वाय यांच्याशी लग्न केलं. त्यांना दोन मुलंही आहेत. सुहास एल वाय हे आयएएस अधिकारी आहेत आणि पॅरा-बॅडमिंटनपटू देखील आहेत. 

ऋतू सुहास यांना मॉडेलिंगची खूप आवड आहे. २०१९ मध्ये झालेल्या मिसेस इंडिया स्पर्धेचे विजेतेपद त्यांनी पटकावलं होतं. ऋतू सुहास यांचा प्रवास आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहे, कारण त्यांनी आपल्या जीवनात संघर्षाचा मार्ग निवडून स्वत:ची स्वप्नं साकार केली. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी