शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

ब्यूटी विद ब्रेन! IAS अधिकारी झाली मिसेस इंडिया; एकेकाळी वृत्तपत्र घेण्यासाठी नव्हते पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 15:57 IST

नातेवाईकांनी ऋतू सुहास यांच्या निर्णयाला विरोध केला कारण महिलांनी घराबाहेर जाऊन काम करणं ही चांगली गोष्ट मानली जात नव्हती. मात्र त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही आणि सरकारी नोकरीसाठी तयारी सुरू ठेवली.

मनात इच्छाशक्ती असेल तर अनेक गोष्टी सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. ऋतू सुहास यांनी कठोर परिश्रम घेऊन UP PCS सारखी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सौंदर्य स्पर्धा मिसेस इंडियाचा किताबही जिंकला.  ऋतू सुहास या IAS अधिकारी असून त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते.

ऋतू सुहास यांचा जन्म १६ एप्रिल १९७६ रोजी लखनौमध्ये झाला. त्यांचे वडील आरपी शर्मा लखनौ उच्च न्यायालयात वकील होते. शालेय शिक्षण नवयुग गर्ल्स कॉलेजमधून झाले. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. २००३ मध्ये आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यासाठी तयारी सुरू केली. 

नातेवाईकांनी ऋतू सुहास यांच्या निर्णयाला विरोध केला कारण त्यावेळी महिलांनी घराबाहेर जाऊन काम करणं ही चांगली गोष्ट मानली जात नव्हती. मात्र त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही आणि सरकारी नोकरीसाठी तयारी सुरू ठेवली. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्याकडे वर्तमानपत्र घेण्यासाठीही पैसे नव्हते.

पैसे मिळावे म्हणून त्यांनी लहान मुलांची शिकवणी घ्यायला सुरुवात केली. अखेर त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं आणि २००४ मध्ये ऋतू सुहास यांनी पीसीएसची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांची पहिली पोस्टिंग मथुरा येथे एसडीएम म्हणून झाली. यानंतर आग्रा, हाथरस आणि सोनभद्र इत्यादी अनेक ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली.

ऋतू सुहास यांना चांगल्या कामासाठी सरकारने गौरविले आहे. त्यांच्या क्षमतेमुळे त्यांना पीसीएस ते आयएएस अधिकारी म्हणून बढती मिळाली. २००८ मध्ये आयएएस अधिकारी सुहास एल वाय यांच्याशी लग्न केलं. त्यांना दोन मुलंही आहेत. सुहास एल वाय हे आयएएस अधिकारी आहेत आणि पॅरा-बॅडमिंटनपटू देखील आहेत. 

ऋतू सुहास यांना मॉडेलिंगची खूप आवड आहे. २०१९ मध्ये झालेल्या मिसेस इंडिया स्पर्धेचे विजेतेपद त्यांनी पटकावलं होतं. ऋतू सुहास यांचा प्रवास आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहे, कारण त्यांनी आपल्या जीवनात संघर्षाचा मार्ग निवडून स्वत:ची स्वप्नं साकार केली. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी