शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

...तर पुन्हा कोरोनाच्या संसर्गाचा धोका; वैद्यकीय तज्ज्ञांकडून महत्त्वाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 08:00 IST

पुरवठ्याअभावी लसीकरणातील खंड धोकादायक

मुंबई : एकीकडे लसीकरणात सातत्याने पडणारा खंड आणि दुसरीकडे निर्बंधामध्ये येणारी शिथिलता यामुळे संसर्गाचा धोका कायम असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. केवळ लसींच्या पुरेशा साठ्याअभावी लसीकरण मोहीम बंद होणे हे कोरोनाविरोधातील एकमेव शस्त्र बोथट करण्यासारखे आहे. त्यामुळे केंद्र शासनानेही लसींच्या साठ्याची बाब गांभीर्याने घ्यावी आणि लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यासाठी सहकार्य करावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.केईएम रुग्णालयाचे डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले, निर्बंध शिथिलतेमुळे रस्त्यांवर पर्यटनाकरिता लोकांची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे लसींच्या डोसअभावी लसीकरण थांबणे चुकीचे आहे. पालिका प्रशासन वा राज्य शासन केंद्राकडे लसींच्या साठ्याकरिता वारंवार विनवण्या करीत आहे, त्यामुळे लसीकरण पूर्ण होणे वा गतीने होणे गरजेचे आहे. नाही तर, पुन्हा एकदा तिसऱ्या लाटेच्या माध्यमातून कोरोना डोके वर काढेल आणि त्याची तीव्रता किती असेल याविषयी अजूनही संशोधन सुरू आहे.राज्य कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले, ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ (सीडीसी) या संस्थेचा अभ्यास अहवाल जाहीर झाला आहे. कोरोनाचा नवा व अधिक संसर्गक्षम डेल्टा प्रकारामुळे लसीकरण करण्याचे आवाहन यात शास्त्रज्ञांनी केले आहे. जे रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, अशांनाही लस घ्यावी, असा सल्लाही अहवालातून दिला आहे. केंद्र सरकारने आताच पावले उचलावीत! लसीकरणामुळे शरीरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होत असल्याचे पुरावे प्रयोगशाळेत मिळाले आहेत. विषाणूच्या नव्या प्रकारापासून लसीमुळे संरक्षण मिळत आहे, असेही अहवालात म्हटले आहे. त्यामुळे भविष्यातील संसर्गाचा धोका टाळण्यासाठी केंद्राने आताच पावले उचलावीत.आधी कोरोना झाला असला तरी लस घ्‍या. विषाणूचे म्युटेशन अधिक धोकादायक असल्याने स्वतः व संपर्कातील लोक सुरक्षित राहण्यासाठी लसीकरण हा उत्तम उपाय आहे, असे आवाहन डॉ. रोशन शहा यांनी केले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या