शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

...तर पुन्हा कोरोनाच्या संसर्गाचा धोका; वैद्यकीय तज्ज्ञांकडून महत्त्वाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 08:00 IST

पुरवठ्याअभावी लसीकरणातील खंड धोकादायक

मुंबई : एकीकडे लसीकरणात सातत्याने पडणारा खंड आणि दुसरीकडे निर्बंधामध्ये येणारी शिथिलता यामुळे संसर्गाचा धोका कायम असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. केवळ लसींच्या पुरेशा साठ्याअभावी लसीकरण मोहीम बंद होणे हे कोरोनाविरोधातील एकमेव शस्त्र बोथट करण्यासारखे आहे. त्यामुळे केंद्र शासनानेही लसींच्या साठ्याची बाब गांभीर्याने घ्यावी आणि लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यासाठी सहकार्य करावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.केईएम रुग्णालयाचे डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले, निर्बंध शिथिलतेमुळे रस्त्यांवर पर्यटनाकरिता लोकांची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे लसींच्या डोसअभावी लसीकरण थांबणे चुकीचे आहे. पालिका प्रशासन वा राज्य शासन केंद्राकडे लसींच्या साठ्याकरिता वारंवार विनवण्या करीत आहे, त्यामुळे लसीकरण पूर्ण होणे वा गतीने होणे गरजेचे आहे. नाही तर, पुन्हा एकदा तिसऱ्या लाटेच्या माध्यमातून कोरोना डोके वर काढेल आणि त्याची तीव्रता किती असेल याविषयी अजूनही संशोधन सुरू आहे.राज्य कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले, ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ (सीडीसी) या संस्थेचा अभ्यास अहवाल जाहीर झाला आहे. कोरोनाचा नवा व अधिक संसर्गक्षम डेल्टा प्रकारामुळे लसीकरण करण्याचे आवाहन यात शास्त्रज्ञांनी केले आहे. जे रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, अशांनाही लस घ्यावी, असा सल्लाही अहवालातून दिला आहे. केंद्र सरकारने आताच पावले उचलावीत! लसीकरणामुळे शरीरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होत असल्याचे पुरावे प्रयोगशाळेत मिळाले आहेत. विषाणूच्या नव्या प्रकारापासून लसीमुळे संरक्षण मिळत आहे, असेही अहवालात म्हटले आहे. त्यामुळे भविष्यातील संसर्गाचा धोका टाळण्यासाठी केंद्राने आताच पावले उचलावीत.आधी कोरोना झाला असला तरी लस घ्‍या. विषाणूचे म्युटेशन अधिक धोकादायक असल्याने स्वतः व संपर्कातील लोक सुरक्षित राहण्यासाठी लसीकरण हा उत्तम उपाय आहे, असे आवाहन डॉ. रोशन शहा यांनी केले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या