शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

प्रियंकांचा उदय हा राहुल गांधींचा पराभव नव्हे, सचिन पायलट यांनी सुनावले

By aparna.velankar | Updated: January 24, 2019 15:46 IST

कॉंग्रेस पक्षातला प्रियंकांचा सक्रीय सहभाग हा येत्या तीन महिन्यातला सर्वात मोठा ‘गेम चेंजर’ठरेल,

ठळक मुद्देप्रियंकांचा उदय हा राहुल यांचा पराभव असल्याची फोल समीकरणे कुणीही मांडू नयेत कॉंग्रेस पक्षातला प्रियंकांचा सक्रीय सहभाग हा येत्या तीन महिन्यातला सर्वात मोठा ‘गेम चेंजर’ठरेलयोगी आदित्यनाथ आणि प्रियांका गांधी या दोघांंमध्ये निवड करण्याची वेळ येईल; तेव्हा सुजाण नागरिकांचा कल कोणाकडे असेल हे ओळखण्यासाठी राजकीय पंडित असण्याची गरज नाही

- अपर्णा वेलणकरडिग्गी पैलेस, जयपूर -  ‘‘प्रियंका गांधी यांची पक्ष संघटनेतली नेमणूक राहुल गांधी यांच्या सहीने झाली आहे; त्यामुळे प्रियंकांचा उदय हा राहुल यांचा पराभव असल्याची फोल समीकरणे कुणीही मांडू नयेत’ असे सुनावत राजस्थानचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी कॉंग्रेस पक्षातला प्रियंकांचा सक्रीय सहभाग हा येत्या तीन महिन्यातला सर्वात मोठा ‘गेम चेंजर’ठरेल, अशी खात्री व्यक्त केली आहे.जागतिक साहित्य-विश्वात मानाचे स्थान प्राप्त केलेल्या ‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल’च्या उदघाटनाच्या दिवशी एका विशेष सत्रात ते बोलत होते.‘‘भारतीय मतदारांचा चेहरा, त्यांच्या अपेक्षा आणि आक्षेप हे सारेच आता बदलले आहे. घराणेशाहीचे जुने आरोप, उध्दट राष्ट्रवादाचा क्रूर चेहेरा आणि कंठाळी राजकीय चर्चांच्या कलकलाटापलीकडे जाऊन वर्तमानासाठी निवड करण्याचे नवे निकष देशातल्या मतदारांनी तयार केले आहेत. योगी आदित्यनाथ आणि प्रियांका गांधी या दोघांंमध्ये निवड करण्याची वेळ येईल; तेव्हा सुजाण नागरिकांचा कल कोणाकडे असेल हे ओळखण्यासाठी राजकीय पंडित असण्याची गरज नाही’ असेही पायलट यांनी सांगितले.प्रियंका गांधी यांच्या प्रवेशामुळे उत्तर प्रदेशात सपा-बसपाच्या युतीला फटका बसून भाजपाच्या विरोधातली मते फुटतील आणि विरोधकांच्या एकीतली हवा निघून जाईल, हे गृहितक पायलट यांनी स्पष्टपणे फेटाळले. प्रियांका यांच्यामुळे देशातील राजकारणाला एक सकारात्मक वळण मिळेल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.डिग्गी पैलेसच्या चारबाग हिरवळीवर सुप्रसिध्द पत्रकार श्रीनिवासन जैन यांनी पायलट यांची मुलाखत घेतली, तेव्हा या तरुण नेत्याने माध्यमांनाही चार शब्द सुनावताना मागेपुढे पाहिले नाही. देशापुढे अनेक गंभीर प्रश्न आहेत, पण निवडणुकीच्या तोंडावर उभ्या असलेल्या सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेतली माध्यमे मात्र कोणी जानवे घातले, कोणाचे गोत्र कोणते, कोण मंदिरात गेले आणि कोण मशिदीत असल्या प्रश्नांवर तासनतासाच्या फुटकळ चर्चा लढवण्यात गर्क आहेत. यात सगळ्यांचाच वेळ फुकट चालला आहे आणि पत्रकारितेच्या नावाखाली डोकेदुखी बोकाळली आहे, असे सचिन पायलट यांनी ठासून सांगीतले; तेव्हा रसिकांनी टाळ्यांचा गजर केला. या मुलाखतीला जगभरातून आलेल्या तरुण साहित्य रसिकांची मोठी गर्दी होती, हे विशेष! 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियांका गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण