शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 14:02 IST

Air India After Plane Crash : या विमानांत असे अनेक प्रवासी होते, ज्यांना दुसरे विमान पकडून पुढे जायचे होते. परंतू, एअर इंडियाच्या सावळ्या गोंधळामुळे या प्रवाशांचेही हाल झाले आहेत.  

टाटाच्या ताब्यात जाताच एअर इंडिया सुधारेल अशी अपेक्षा सरकारलाच नाही तर जनतेलाही होती. परंतू, आता दोन-तीन वर्षे होत आली तरी काही केल्या एअर इंडिया सुधरायचे नाव घेताना दिसत नाहीय. अहमदाबाद अपघातानंतर डीजीसीएने एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांना हटविण्याचे आदेश दिलेले असताना आता निष्काळजीपणाचा कहर करणारे वृत्त येत आहे. 

एअर इंडियाची दोन विमाने वेगवेगळ्या विमानतळांवरून बिहारची राजधानी पटनाला लगेज न घेताच आली आहेत. एअर इंडियाने कारणही हास्यास्पद दिले आहे. एकाच दिवशी असा प्रकार एकाच विमानतळासाठी घडल्याने विमानतळावर उतरताच प्रवाशांचा गोंधळ सुरु झाला. यावेळी एअर इंडियाने पटना विमानतळाची धावपट्टी लहान आहे आणि पाऊस पडत होता. त्यामुळे जड सामान येऊ शकले नाही, असे कारण दिले आहे. 

त्याहून कहर म्हणजे आज एअर इंडियाचे कोणतेही विमान पटनाला येणार नाहीय. उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत हे सामान पटनाला पोहोचेल असेही सांगण्यात आले आहे. म्हणजे ज्या प्रवाशांची पटनामध्ये सोय नाही त्या प्रवाशांना घरी न जाता पटन्यातच सामानाची वाट पाहत थांबावे लागणार आहे. बंगळुरूवरून आलेल्या IX2936 या विमानाने १८० प्रवाशांचे साहित्य बंगळुरुलाच ठेवले आहे. फक्त प्रवाशांना आणून विमानतळावर सोडले आहे. तसेच चेन्नईवरून आलेल्या XI1634 या विमानाने देखील प्रवाशांचे साहित्य मागेच ठेवले आहे. 

वजन जास्त झाले म्हणून प्रवाशांच्या बॅगा आणल्या नाहीत, असे कारण एअर इंडियाने दिले आहे. प्रवासी विमानतळावर उतरताच लगेजची वाट पाहत होते. परंतू ते आलेच नाही. यामुळे गोंधळ सुरु झाला. यावेळी एअर इंडियाने प्रवाशांना तुमचे लगेजच आणलेले नाही असे सांगितले. प्रवासी वाद घालू लागल्यानंतर एअर इंडियाने सामान प्रवाशांच्या थेट घरी पोहोचविण्याचे आश्वासन दिले आहे.  

या विमानांत असे अनेक प्रवासी होते, ज्यांना दुसरे विमान पकडून पुढे जायचे होते. परंतू, एअर इंडियाच्या सावळ्या गोंधळामुळे या प्रवाशांचेही हाल झाले आहेत.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटनाBiharबिहार