शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 14:02 IST

Air India After Plane Crash : या विमानांत असे अनेक प्रवासी होते, ज्यांना दुसरे विमान पकडून पुढे जायचे होते. परंतू, एअर इंडियाच्या सावळ्या गोंधळामुळे या प्रवाशांचेही हाल झाले आहेत.  

टाटाच्या ताब्यात जाताच एअर इंडिया सुधारेल अशी अपेक्षा सरकारलाच नाही तर जनतेलाही होती. परंतू, आता दोन-तीन वर्षे होत आली तरी काही केल्या एअर इंडिया सुधरायचे नाव घेताना दिसत नाहीय. अहमदाबाद अपघातानंतर डीजीसीएने एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांना हटविण्याचे आदेश दिलेले असताना आता निष्काळजीपणाचा कहर करणारे वृत्त येत आहे. 

एअर इंडियाची दोन विमाने वेगवेगळ्या विमानतळांवरून बिहारची राजधानी पटनाला लगेज न घेताच आली आहेत. एअर इंडियाने कारणही हास्यास्पद दिले आहे. एकाच दिवशी असा प्रकार एकाच विमानतळासाठी घडल्याने विमानतळावर उतरताच प्रवाशांचा गोंधळ सुरु झाला. यावेळी एअर इंडियाने पटना विमानतळाची धावपट्टी लहान आहे आणि पाऊस पडत होता. त्यामुळे जड सामान येऊ शकले नाही, असे कारण दिले आहे. 

त्याहून कहर म्हणजे आज एअर इंडियाचे कोणतेही विमान पटनाला येणार नाहीय. उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत हे सामान पटनाला पोहोचेल असेही सांगण्यात आले आहे. म्हणजे ज्या प्रवाशांची पटनामध्ये सोय नाही त्या प्रवाशांना घरी न जाता पटन्यातच सामानाची वाट पाहत थांबावे लागणार आहे. बंगळुरूवरून आलेल्या IX2936 या विमानाने १८० प्रवाशांचे साहित्य बंगळुरुलाच ठेवले आहे. फक्त प्रवाशांना आणून विमानतळावर सोडले आहे. तसेच चेन्नईवरून आलेल्या XI1634 या विमानाने देखील प्रवाशांचे साहित्य मागेच ठेवले आहे. 

वजन जास्त झाले म्हणून प्रवाशांच्या बॅगा आणल्या नाहीत, असे कारण एअर इंडियाने दिले आहे. प्रवासी विमानतळावर उतरताच लगेजची वाट पाहत होते. परंतू ते आलेच नाही. यामुळे गोंधळ सुरु झाला. यावेळी एअर इंडियाने प्रवाशांना तुमचे लगेजच आणलेले नाही असे सांगितले. प्रवासी वाद घालू लागल्यानंतर एअर इंडियाने सामान प्रवाशांच्या थेट घरी पोहोचविण्याचे आश्वासन दिले आहे.  

या विमानांत असे अनेक प्रवासी होते, ज्यांना दुसरे विमान पकडून पुढे जायचे होते. परंतू, एअर इंडियाच्या सावळ्या गोंधळामुळे या प्रवाशांचेही हाल झाले आहेत.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटनाBiharबिहार