शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 14:02 IST

Air India After Plane Crash : या विमानांत असे अनेक प्रवासी होते, ज्यांना दुसरे विमान पकडून पुढे जायचे होते. परंतू, एअर इंडियाच्या सावळ्या गोंधळामुळे या प्रवाशांचेही हाल झाले आहेत.  

टाटाच्या ताब्यात जाताच एअर इंडिया सुधारेल अशी अपेक्षा सरकारलाच नाही तर जनतेलाही होती. परंतू, आता दोन-तीन वर्षे होत आली तरी काही केल्या एअर इंडिया सुधरायचे नाव घेताना दिसत नाहीय. अहमदाबाद अपघातानंतर डीजीसीएने एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांना हटविण्याचे आदेश दिलेले असताना आता निष्काळजीपणाचा कहर करणारे वृत्त येत आहे. 

एअर इंडियाची दोन विमाने वेगवेगळ्या विमानतळांवरून बिहारची राजधानी पटनाला लगेज न घेताच आली आहेत. एअर इंडियाने कारणही हास्यास्पद दिले आहे. एकाच दिवशी असा प्रकार एकाच विमानतळासाठी घडल्याने विमानतळावर उतरताच प्रवाशांचा गोंधळ सुरु झाला. यावेळी एअर इंडियाने पटना विमानतळाची धावपट्टी लहान आहे आणि पाऊस पडत होता. त्यामुळे जड सामान येऊ शकले नाही, असे कारण दिले आहे. 

त्याहून कहर म्हणजे आज एअर इंडियाचे कोणतेही विमान पटनाला येणार नाहीय. उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत हे सामान पटनाला पोहोचेल असेही सांगण्यात आले आहे. म्हणजे ज्या प्रवाशांची पटनामध्ये सोय नाही त्या प्रवाशांना घरी न जाता पटन्यातच सामानाची वाट पाहत थांबावे लागणार आहे. बंगळुरूवरून आलेल्या IX2936 या विमानाने १८० प्रवाशांचे साहित्य बंगळुरुलाच ठेवले आहे. फक्त प्रवाशांना आणून विमानतळावर सोडले आहे. तसेच चेन्नईवरून आलेल्या XI1634 या विमानाने देखील प्रवाशांचे साहित्य मागेच ठेवले आहे. 

वजन जास्त झाले म्हणून प्रवाशांच्या बॅगा आणल्या नाहीत, असे कारण एअर इंडियाने दिले आहे. प्रवासी विमानतळावर उतरताच लगेजची वाट पाहत होते. परंतू ते आलेच नाही. यामुळे गोंधळ सुरु झाला. यावेळी एअर इंडियाने प्रवाशांना तुमचे लगेजच आणलेले नाही असे सांगितले. प्रवासी वाद घालू लागल्यानंतर एअर इंडियाने सामान प्रवाशांच्या थेट घरी पोहोचविण्याचे आश्वासन दिले आहे.  

या विमानांत असे अनेक प्रवासी होते, ज्यांना दुसरे विमान पकडून पुढे जायचे होते. परंतू, एअर इंडियाच्या सावळ्या गोंधळामुळे या प्रवाशांचेही हाल झाले आहेत.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटनाBiharबिहार