शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गलवान व्हॅलीचा बदला! भारताने दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका धाडल्या; पाणबुड्याही तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 17:35 IST

भारतीय नौदलाने गलवान व्हॅलीतील घटनेनंतर चीनसोबतचा तणाव पाहून चीनच्या समुद्रात युद्धनौकाच तैनात केली आहे. महत्वाचे म्हणजे याच दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्याही मोठमोठ्या विमानवाहू युद्धनौका तैनात आहेत.

नवी दिल्ली : जूनच्या मध्यावर लडाखमधील गलवान व्हॅलीमध्ये चीनने भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला होता. गोळी चालविण्यास बंदी म्हणून लोखंडी तारांच्या रॉडनी पाठीमागून वार करण्यात आला होता. यातून सावरत भारतीय जवानांनीही जोरदार पाण्याच्या प्रवाहात चिनी सैनिकांवर मात केली. या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले तर चीनचे त्याहून अधिक मारले गेले. आता भारताने चीनच्या या कृत्याविरोधात आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. 

भारतीय नौदलाने गलवान व्हॅलीतील घटनेनंतर चीनसोबतचा तणाव पाहून चीनच्या समुद्रात युद्धनौकाच तैनात केली आहे. महत्वाचे म्हणजे याच दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्याही मोठमोठ्या विमानवाहू युद्धनौका तैनात आहेत. त्यांच्या जोडीनेच भारतानेही आघाडीची युद्धनौका पाठविली आहे. 

या भागात भारतीय नौदलाच्या अस्तित्वावर चीनकडून नेहमीच आक्षेप घेण्यात येत होता. 2009 पासून चीन या भागात कृत्रिम बेटे बनविणे आणि सैन्य तैनात करत होते. ''गलवान व्हॅलीमध्ये चीनच्या हल्ल्यात आपले 20 जवान शहीद झाले. यानंतर लगेचच भारतीय नौदलाने चीन दावा सांगत असलेल्या दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका पाठविली आहे. चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी या भागात दुसऱ्या देशांच्या सैन्याला विरोध करते. या भागातील पाण्यावर चीन आपला हक्क सांगत आले आहे.'', असे सरकारी सुत्रांनी एएनआयला सांगितले. 

भारताच्या या तातडीने उचललेल्या पावलांचा फायदा चीनसोबतच्या तणाव निवळण्यावर आणि चीनच्या आक्रमकतेवर झाला आहे. यामुळे चीन चर्चा करतेवेळी नरमला आहे. याच काळात अमेरिकेच्या युद्धनौका येऊन पोहोचल्याने अमेरिकन नौदलासोबतही भारतीय युद्धनौका संपर्क ठेवून आहे.

मलाक्का सामुद्रधुनी आणि अंदमानच्या मार्गावरही अन्य युद्धनौका लक्ष ठेवून आहेत. या भारतीय भागात चीनचे नौदल प्रवेश करू शकते. तसेच चीनच्या युद्धनौका, पाणबुड्यांवरही करडी नजर ठेवण्यात येत आहे. या भागातून अनेकदा चीनच्या युद्धनौकांनी हालचाली केल्या आहेत. या युद्धनौकांना इंधनाची गरज भासली तर त्या या भागाकडून पुढे जातात. 

यानंतर लगेचच पाणबुड्या तैनात करण्याची तयारी भारतीय नौदलाने केली आहे. तसेच मानवरहीत पाणबुड्याही तैनात केल्या जाणार आहेत. शिवाय सेन्सरही लावले जाणार आहेत. यामुळे पाण्याखालील शत्रूच्या हाचलाची लगेचच भारतीय नौदलाला समजणार आहेत.  

खूशखबर! कोरोना लसीचे काऊंटडाऊन सुरु; 'Covishield' 42 दिवसांत मिळू शकते

 

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीनAmericaअमेरिकाindian navyभारतीय नौदल