शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
7
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
8
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
9
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
10
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
11
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
12
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
13
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
14
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
15
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
16
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
17
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
18
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
19
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
20
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!

शीख विरोधी दंगलीतील राजीव गांधींच्या भूमिकेचा जगदीश टायटलर यांच्याकडून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 21:44 IST

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीख विरोधी दंगल भडकली होती. 1984 रोजीच्या या दंगलीत अनेकांना जीव गमवावा लागला होता.

नवी दिल्ली- माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीख विरोधी दंगल भडकली होती. 1984 रोजीच्या या दंगलीत अनेकांना जीव गमवावा लागला होता. ही दंगल काही केल्या थांबण्याचं नाव घेत नव्हती. या दंगलीदरम्यान दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी हे माझ्यासोबत रस्त्यावर खुलेआम फिरत होते, असं विधान 1984च्या शीख दंगलीचे मुख्य आरोपी आणि माजी खासदार जगदीश टायटलर यांनी केलं आहे.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत टायटलर यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे. दंगल भडकली त्यावेळी राजीव गांधी माझ्यासोबत कारमध्ये बसले होते. आणि या दंगलीचे दिल्लीत कसे पडसाद उमटतायत, याची चाचपणी केली होती. शीख विरोधी दंगल भडकल्यामुळे राजीव गांधी काहीसे काँग्रेस खासदारांवर नाराज होते. मतदारसंघात शांतता बाळगण्याचे आवाहन करा, असा आदेश त्यांनी काँग्रेस खासदारांना दिला होता, असंही टायटलर म्हणाले आहे. दिल्लीतल्या रस्त्यांवर दंगल कशी घडते, याचा पंतप्रधान राजीव गांधींनी आढावाही घेतला होता.जगदीश टायटलर यांच्या विधानानंतर पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. टायटलर यांच्या विधानानुसार राजीव गांधी हे 1984मध्ये दिल्लीच्या रस्त्यांवर फिरत होते. टायटलर यांनी केलेल्या विधानाचा अर्थ तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे शिखांच्या हत्या कशा प्रकारे होतात, यावर लक्ष ठेवून होते, असाही निघत असल्याचं सुखबीर सिंह बादल यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही बादल यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.जगदीश टायटलर यांचं विधान निराधार असल्याचं म्हणत काँग्रेसनं त्यांच्यावर पलटवार केला आहे. 1984च्या शीख दंगलीत असे काहीही घडले नसल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. इंदिराजींच्या हत्येनंतर शीख विरोधी दंगल उसळली होती. या दंगलीच्या चौकशीसाठी नानावटी आयोग स्थापण्यात आला होता. या आयोगानेही जगदीश टायटलर यांना हिंसाचाराबाबत दोषी ठरवले होते, असंही अमरिंदर सिंह म्हणाले आहेत. 31 ऑक्टोबर 1984 रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची त्यांच्याच अंगरक्षकांनी हत्या केली होती. इंदिरा गांधींच्या  हत्येनंतर दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शीख विरोधी दंगली उसळल्या होत्या. या दंगलीत हजारो लोकांना स्वतःच्या प्राणांना मुकावे लागले आहे. तर या दंगलीचे दिल्लीत सर्वाधिक बळी ठरले होते.

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीRajiv Gandhiराजीव गांधी