शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

आणखी सात साहित्यिक पुरस्कार परत करणार

By admin | Updated: October 12, 2015 22:53 IST

देशात धर्मांधतेच्या विषाचा केला जाणारा प्रसार आणि वाढत्या असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी सोमवारी आणखी सात अग्रणी लेखकांनी

नवी दिल्ली : देशात धर्मांधतेच्या विषाचा केला जाणारा प्रसार आणि वाढत्या असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी सोमवारी आणखी सात अग्रणी लेखकांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांची संख्या २१ वर पोहोचली आहे. दरम्यान, बुकर पुरस्कारप्राप्त लेखक सलमान रश्दी यांनीही पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांना समर्थन दिले आहे.रश्दी यांनी म्हटले आहे की, मी नयनतारा सहगल व अन्य लेखकांच्या विरोधाशी सहमत आहे. जवाहरलाल नेहरूंच्या ८८ वर्षीय भाची असलेल्या सहगल यांचा साहित्य अकादमी पुरस्कार परत केलेल्या पहिल्या तीन साहित्यिकांत समावेश आहे. सोमवारी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेणाऱ्या अग्रणी साहित्यिकांत काश्मिरी लेखक गुमाल नबी ख्याल, उर्दू कादंबरीकार रहमान अब्बास, कन्नड लेखक आणि अनुवादक श्रीनाथ डी.एन., हिंदी लेखक राजेश जोशी व मंगलेश डबराल, वरयाम संधू, जी. एन. रंगनाथ राव यांचा समावेश आहे. ख्याल यांनी म्हटले आहे की, देशातील अल्पसंख्यकांमध्ये असुरक्षितपणाची भावना निर्माण झाली आहे.दरम्यान, साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्याचे सत्र सुरूच असल्यावरून साहित्य अकादमीने २३ आॅक्टोबरला बैठक बोलावली आहे. अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी म्हटले आहे की, ही संस्था भारताच्या घटनेमध्ये निर्देशित केल्याप्रमाणे धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांशी बांधील आहे. उर्दू लेखक रहमान अब्बास यांनी म्हटले आहे की, दादरीच्या घटनेनंतर उर्दू लेखक समुदाय अत्यंत निराश झाला आहे. त्यामुळे मी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना त्यांची तिसरी कादंबरी ‘खुदा के साये में आंख मिचौली’साठी २०११ मध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. श्रीनाथ यांनी म्हटले आहे की, पेनच्या जागी आता गोळ्या चालवल्या जात आहेत. भीष्म साहनी यांच्या हिंदीतील लघुकथांचा कन्नडमध्ये अनुवाद केल्याबद्दल श्रीनाथ यांना २००९ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.कलबुर्गी यांच्या हत्येबाबत अकादमीने पाळलेल्या मौनाचा विरोध करताना डबराल आणि जोशी यांनी म्हटले आहे की, मागील एक वर्षात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आपल्या इच्छेनुसार जीवन जगण्याचे स्वातंत्र्य या लोकशाही मूल्यांवर हिंदुत्ववादी शक्ती हल्ला करीत आहेत. ते कधीही स्वीकारार्ह नाही. दरम्यान, अकादमीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्याबाबत अकादमीला माहिती दिलेली नाही, असे सांगितले. उदय प्रकाश, जी. एन. देवी, अमन सेठी, वारयाम सिंधू आणि जी. एन. रंगनाथ राव यांच्याशिवाय कोणत्याही लेखकाने माहिती दिलेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. लेखक, कवी आणि नाटककार असलेल्या राजेश जोशी यांना २००२ मध्ये ‘दो पंक्तियों के बीच’ या कलाकृतीसाठी अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. त्यांनी सांगितले की, अकादमीच्या अध्यक्षांना मी पत्र लिहिले असून, पुरस्काराची रक्कम लवकरच परत करणार आहे, अशी माहिती दिली आहे. देशात ज्या प्रकारे धर्मांधतेचे वातावरण पसरवले जात आहे, ते सहिष्णुतेच्या परंपरेला साजेसे नाही. आता साहित्यिकांनी परत केलेल्या पुरस्काराच्या रकमेचे काय करायचे, याचा निर्णय अकादमीने घ्यायचा आहे. यापूर्वी उदय प्रकाश, नयनतारा सहगल, अशोक वाजपेयी, गणेश देवी यांच्यासह इतर काहींनी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घोषित केलेला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)