शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

कमी पावसामुळे किरकोळ महागाई वाढणार; कांदा, बटाटा व टोमॅटोचे दर वधारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 06:54 IST

कमी पावसामुळे कांदा, बटाटा व टोमॅटो या सर्वाधिक मागणीच्या तीन भाज्यांचे दर वधारू लागले आहेत.

मुंबई : कमी पावसामुळे कांदा, बटाटा व टोमॅटो या सर्वाधिक मागणीच्या तीन भाज्यांचे दर वधारू लागले आहेत. यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीपर्यंत (जानेवारी-मार्च २०१९) किरकोळ महागाई दरात वाढीची शक्यता आहे. हा दर ४ टक्क्यांच्या वर जाऊ शकतो, असा स्टेट बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाचा अंदाज आहे.आॅगस्ट महिन्यातील महागाईचा दर जुलैच्या ४.१७ टक्क्यांवरून ३.६९ पर्यंत घसरला, पण खरिपाच्या पिकांची स्थिती कमी पावसामुळे आॅगस्टनंतर बदलली. सप्टेंबर महिन्यात घाऊक बाजारात कांदा ९ टक्के महाग झाला आहे. नोव्हेंबर ते मे या काळात कांद्याची मागणीमोठी असते. यामुळे कांद्याचे दर किमान २५ ते ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. सध्या २ टक्के महाग झालेला टोमॅटोसुद्धा ५ ते १० टक्के व अडीच टक्के महाग असलेले बटाट्याचे दरही १० टक्क्यांपर्यंत वधारू शकतात. यातूनच महागाई दर वाढेल, असा अंदाज बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्य कांती घोष यांनी वर्तविला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात धान्यांची आवक यंदा वाढलेली आहे, पण भारतीय बाजार हा देशांतर्गत पिकांवर अवलंबून असतो. कमी पावसामुळे देशांतर्गत भाजीपाला व धान्यांची उपलब्धता कमी राहण्याची शक्यता आहे.कृषी निर्यात धोरण आवश्यककमी पावसामुळे सध्या देशात निर्माण झालेली स्थिती पाहता, केंद्राने कृषी निर्यात धोरण लवकरात लवकर तयार करण्याची गरज आहे. हे धोरण लवकर तयार झाल्यास महागाईच्या दरावर त्याचा निश्चितच परिणाम दिसेल.

टॅग्स :InflationमहागाईSBIएसबीआय