शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

महागाईचा भडका! 10 वर्षांपूर्वी 100 रुपयांना मिळणारी वस्तू आज कितीला?; पाहा किती येतो खिशावर ताण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 12:33 IST

Inflation in India : 2012 मध्ये एखादी गोष्ट आपण जर 100 रुपयांमध्ये खरेदी करत असू तर आता त्याच गोष्टीसाठी आपल्याला 170.1 रुपये खर्च करावे लागत आहेत.

नवी दिल्ली - सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. रोजच्या वापरातील काही गोष्टींसाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. भाज्या, फळं, धान्य, कपडे, साबण, शॅम्पू, पावडर यासह अनेक वस्तू महाग झाल्या आहेत. कोरोनानंतर आता महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. एप्रिलमध्ये महागाईचा किरकोळ दर 7.79% होता. यापूर्वी 2014 मध्ये महागाईचा दर 8 टक्क्यांपेक्षा वर गेला होता. आपल्या देशात सर्वसामान्य माणसाचं महिन्याचं उत्पन्न सरासरी साडेबारा हजार आहे. 

सध्याच्या महागाईच्या काळात या 80 कोटी जनतेचं पोट भरण्यासाठी सरकारतर्फे मोफत धान्य दिलं जातं. महागाईचा दर वाढणं याचाच अर्थ कोणत्याही वस्तू किंवा सेवेची किंमत काळानुसार वाढणं. याला कोणत्याही महिना किंवा वर्षाच्या हिशेबानुसार मोजलं जातं. उदाहरणार्थ वर्षभरापूर्वी जर एखादी वस्तू 100 रुपयांना मिळत असेल आणि आता तिची किंमत 105 रुपये झाली असेल तर याचा अर्थ त्याचा वार्षिक महागाई दर 5 टक्के आहे. 

- सध्या महागाईचा दर 2012 च्या बेस प्राईसवर मोजला जातो. म्हणजेच 2012 मध्ये 100 रुपयांत जी गोष्ट आपण खरेदी करू शकत होतो तिच्यासाठी आता किती किंमत मोजावी लागते यावरून त्याचा अंदाज बांधला जातो.

- 2012 मध्ये एखादी गोष्ट आपण जर 100 रुपयांमध्ये खरेदी करत असू तर आता त्याच गोष्टीसाठी आपल्याला 170.1 रुपये खर्च करावे लागत आहेत. त्याच गोष्टीसाठी एक वर्षभरापूर्वी 157.8 रुपये मोजावे लागत होते. म्हणजेच एका वर्षात तीच गोष्ट खरेदी करण्यासाठी 12.3 रुपये जास्त मोजावे लागत आहेत.

- एका वर्षभरातच तीच गोष्ट खरेदी करण्यासाठी 157.8 रुपयांऐवजी आता 170.1 रुपये खर्च करावे लागत आहे. याचाच अर्थ महागाईचा दर 7.79% इतका झाला आहे.

भारतात महागाईचा दर मोजण्याचे दोन निर्देशांक आहेत. एक म्हणजे ग्राहक मूल्य निर्देशांक (CPI) आणि दुसरा आहे घाऊक (होलसेल) मूल्य निर्देशांक (WPI). CPI च्या माध्यमातून महागाईचा किरकोळ दर काढला जातो. तर WPI च्या माध्यमातून किरकोळ महागाई दर मोजला जातो. सर्वसामान्य ग्राहक किरकोळ बाजारातून सामान खरेदी करतात. किरकोळ बाजारातील सामान किती महाग किंवा स्वस्त झालं आहे हे CPI च्या माध्यमातून लक्षात येतं. तर मोठमोठ्या व्यावसायिक कंपन्या ठोक म्हणजेच घाऊक बाजारातून सामान खरेदी करतात. या होलसेल बाजारातील बदल WPI च्या माध्यमातून समजतात.

2012 मध्ये 100 रुपयांना मिळत होती त्या विविध गोष्टींच्या किंमती आता साधारणपणे किती झाल्या आहेत ते जाणून घेऊया...

2012 मध्ये 100 रुपयांना मिळणाऱ्या धान्यासाठी आता 152.9 रुपये मोजावे लागत आहेत. मांस आणि मच्छीची किंमत 211.8 रुपये, अंड्यासाठी 164.6 रुपये, तर दुधासाठी 163.9 द्यावे लागत आहेत.

तेलासाठी आता 199.5 रुपये, डाळींसाठी 166.2 रुपये, साखर 119.0 रुपये मोजावे लागत आहेत. फळांची किंमत आता 172.6 रुपये, भाजीची किंमत 166.3 रुपये, मसाल्यांसाठी 181.2 रुपये अशी वाढ झाली आहे. 

नॉन अल्कोहोलिक बेव्हरेजेससाठी 166.2 रुपये, पॅकबंद अन्नपदार्थ, स्नॅक्स, मिठाईची किंमत 180. 9 रुपये झाली आहे.

जेवण आणि पेय 170.8 रुपये, पान-तंबाखू 193.9 रुपये, कपडे 173.9 रुपये, बूट –चप्पल 166.2 रुपये, इंधन आणि लाईट 172.4 रुपये अशी वाढ झाली आहे. 'आजतक'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :InflationमहागाईIndiaभारत