शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ईशान्येतील निकाल हे 2019 मध्ये काय घडणार त्याचे संकेत - अमित शहा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 16:52 IST

त्रिपुराचा निकाला हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या राजकारणाचा विजय आहे. हा आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे.

ठळक मुद्देईशान्येत मिळालेल्या विजयासह आता कर्नाटकातही आम्ही विजयासाठी जोरदार प्रयत्न करु असे अमित शहा यांनी सांगितले.आधी भाजपाला फक्त हिंदी भाषिक पट्टयापर्यंत मर्यादीत ठरवण्यात आले होते.

नवी दिल्ली - त्रिपुराचा निकाला हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या राजकारणाचा विजय आहे. हा आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडच्या जनतेचे आभार मानतो असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी निकालानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

ईशान्य भारतातील निवडणुकांचे हे निकाल 2019 मध्ये काय घडणार त्याचे संकेत आहेत. ईशान्येत मिळालेल्या विजयासह आता कर्नाटकातही आम्ही विजयासाठी जोरदार प्रयत्न करु असे अमित शहा यांनी सांगितले. आजच्या निकालाने लोकांना आता डावे आवडत नाहीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्रिपुरामध्ये भाजपाकडे स्पष्ट बहुमत असले तरी आम्ही आघाडीतील सहकारी पक्षालाही मंत्रिमंडळात स्थान देऊ असे शहा यांनी सांगितले. 

आधी भाजपाला फक्त हिंदी भाषिक पट्टयापर्यंत मर्यादीत ठरवण्यात आले होते. पण आजच्या निकालाने हा समज चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहेत. आम्ही जो नारा दिला होता त्यानुसार त्रिपुराच्या जनतेने परिवर्तन घडवून दाखवले आहे असे शहा म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहTripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018