शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 05:15 IST

स्थानबद्धतेनंतर प्रथमच दिली मुलाखत : नॅशनल कॉन्फरन्स नेते फारुख अब्दुल्ला यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘विश्वासघात’ करून जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा हिरावून घेतल्याचा अरोप करीत सरकारने हा दर्जा पुन्हा बहाल करून काश्मिरी जनतेचा गमावलेला विश्वास पुन्हा जिंकावा, अशी आवाहनवजा आग्रही मागणी काश्मीरचे ज्येष्ठ नेते व ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी केली आहे.राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये असलेला जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आणून या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेश करण्याचे पाऊल केंद्र सरकारने उचलल्याला येत्या ५ आॅगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत डॉ. अब्दुल्ला यांनी हे आवाहन केले. काश्मीरच्या या दर्जा बदलानंतर १० महिने स्थानबद्ध केल्या गेलेल्या या ८२ वर्षांच्या नेत्याने सुटकेनंतर माध्यमांना दिलेली ही पहिलीच मुलाखत होती.अब्दुल्ला म्हणाले की, ज्या विश्वासाने काश्मीर भारतात विलीन झाले त्याचा तो विश्वास केंद्र सरकारच्या या निर्णयाने पार धुळीला मिळाला आहे. केंद्र सरकारला काश्मिरी जनतेचा विश्वास पुन्हा जिंकावाच लागेल व तो जिंकण्यासाठी अन्याय्य पद्धतीने हिरावून घेतलेला राज्याचा दर्जा जम्मू-काश्मीरला पुन्हा बहाल करणे हाच एकमेव उपाय आहे.अब्दुल्ला म्हणाले की, अनुच्छेद ३७० रद्द केले की जम्मू-काश्मीरची भरभराट होईल, तेथील दहशतवाद संपुष्टात येईल, असे स्वप्न केंद्र सरकारने दाखविले; पण लोकांना विचाराल तर ते सांगतील की, दहशतवाद कमी होण्याऐवजी उलट आणखी वाढला आहे. खरे तर नवे काही मिळण्याऐवजी आम्ही होते तेही गमावून बसलो आहोत. नॅशनल कॉन्फरन्सने इतर अनेकांप्रमाणे केंद्र सरकारच्या या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे व न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे, असे ते म्हणाले.गौरवही हिरावून घेतल्याने काश्मीर हताशआधी दोन दशकांच्या दहशतवादाने काश्मीर पोळले आहे. आता कोरोना महामारीने लोक हैराण झाले आहेत. त्यातच आमचा गौरवही हिरावून घेतल्याने काश्मीर पार हताश झाले आहे. आम्ही हातात कधीही बंदूक घेतलेली नाही व यापुढेही घेणार नाही. एक राजकीय पक्ष म्हणून या अन्यायाविरुद्ध आम्ही सर्व सनदशीर मार्गांनी शेवटपर्यंत लढत राहू, असेही ते म्हणाले की,

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर