शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सीएए रद्द करण्याचा ठराव पंजाब विधानसभेत संमत; धार्मिक आधाराला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 05:41 IST

संसदेने संमत केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. अशाच प्रकारचे आंदोलन पंजाबमध्येही शांततेने झाले.

चंदीगड : केरळपाठोपाठ पंजाब राज्याच्या विधानसभेनेही नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) रद्दबातल करावा, अशी मागणी करणारा ठराव शुक्रवारी संमत केला. पंजाबचे संसदीय कामकाजमंत्री ब्रह्म महिंद्र यांनी मांडलेल्या या ठरावावर विधानसभेत तीन तास चर्चा होऊन मग तो मंजूर करण्यात आला.

धार्मिक आधारावरील कायद्यामुळे समाजातील काही घटकांची भाषिक व सांस्कृतिक ओळख पुसली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकत्व दुरुस्ती कायदा केंद्र सरकारने रद्दबातल करावा अशी मागणी पंजाब विधानसभेने संमत केलेल्या ठरावात करण्यात आली आहे.

अशाच प्रकारचा ठराव देशात सर्वप्रथम केरळ विधानसभेने संमत केला होता. आता त्याचेच अनुकरण पंजाबने केले आहे. केरळमध्ये डाव्यांची, तर पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. पंजाब विधानसभेत या ठरावाला सत्ताधारी काँग्रेस व मुख्य विरोधी पक्ष आम आदमी पक्षाने पाठिंबा दिला, तर भाजपने जोरदार विरोध केला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामध्ये मुस्लिमांचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी शिरोमणी अकाली दलाने केली.

धार्मिक छळामुळे पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमध्ये होणाऱ्या धार्मिक छळाला कंटाळून पारशी, जैन, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, हिंदू धर्मीयांपैकी जे लोक ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात आश्रयाला आले, त्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद या दुरुस्ती कायद्यात आहे. मात्र, त्यातून मुस्लिमांना वगळण्यात आले आहे. धर्मनिरपेक्षतेला धोकाहा ठराव मांडताना ब्रह्म महिंद्र यांनी सांगितले की, संसदेने संमत केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. अशाच प्रकारचे आंदोलन पंजाबमध्येही शांततेने झाले. त्यात समाजातील सर्व समाजांतील व धर्मांतील लोक सहभागी झाले होते. या कायद्यामुळे देशातील धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा धागा कमकुवत होऊ शकतो.

टॅग्स :Punjabपंजाब