शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 14:30 IST

Employee News: नोएडा येथील एका कंपनीच्या एचआरने एका नव्या कर्मचाऱ्याने कुठलंही सबळ कारण न देता नोकरी सोडल्याच्या घटनेचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नवी नोकरी मिळाल्यानंतर तिथलं काम आणि ऑफीसमधील वातावरण न आवडल्यास तातडीने तिथलं काम सोडून देण्याचं प्रमाण हल्ली वाढलं आहे. दरम्यान, नोएडा येथील एका कंपनीच्या एचआरने एका नव्या कर्मचाऱ्याने कुठलंही सबळ कारण न देता नोकरी सोडल्याच्या घटनेचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच एका दिवसातच नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याबाबत सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली आहे. 

यासंदर्भात व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये खुशी चौरसिया म्हणाल्या की, आमच्याकडे  सेल्स रोल जॉईन करण्यासाठी आलेल्या एका कर्मचाऱ्याने त्याच्या कामाचा पहिला दिवस संपल्यानंतर मला एक मेसेज केला. तसेच मला हे काम आवडलेलं नाही असं सांगितलं. त्यानंतर हे काम आव्हानात्मक असल्याचं मी मान्य केलं. तसेच कामातील सर्व बाबींबाबत सदर कर्मचाऱ्याला मुलाखतीत उत्तीर्ण झाल्यानंतर कल्पना देण्यात आली होती.

या घटनेनंतर नव्या नोकरीच्या शोधात असलेल्या नव्या उमेदवारांना एचआरने सवाल विचारला आहे. एका रात्रीत काय बदललं? कुठलंही काम एका दिवसात एकदम चांगलं होत नाही. कुठलीही कंपनी २४ तासांमध्ये सर्व काही सिद्ध करून दाखवू शकत नाही. तसेच जोपर्यंत तुम्ही आपली वेळ, शक्ती  आणि मानसिकता एखाद्या कामासाठी खर्ची घालत नाही, तोपर्यंत कुठलंही काम आरामदायी वाटणार नाही.

तसेच उमेदवारांनी मुलाखतीदरम्यान आणि नोकरीची ऑफर स्वीकारण्यापूर्वी थोडा वेळ घेऊन आपण हे काम करू शकतो की नाही याबाबत विचार केला पाहिजे सल्लाही या एचआरने दिला. त्यासोबतच नोकरी सोडाचयी असेल तर उमेदवारांना व्यावसायिक दृष्टीकोनातून आपलं म्हणणं मांडला आलं पाहिजे. तसेच विकास हा योग्य नोकरीमधून नव्हे तर धैर्य, स्पष्टता आणि असुविधांमधून शिकून होतो, असेही या एचआरने सांगितले.

दरम्यान, आपल्या या पोस्टमधून सदर एचआरने सदर कर्मचाऱ्यासोबत झालेल्या चर्चेचेही काही स्क्रीनशॉटही शेअर केले  होते. तसेच त्यावर समाजमाध्यमांमधील वापरकर्त्यांकडून विविध प्रतिक्रियाही उमटत आहेत. 

टॅग्स :jobनोकरीEmployeeकर्मचारीResignationराजीनामा