शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

नरेंद्र मोदींच्या आकसापोटी काँग्रेसचे छत्र हरवलेल्या साहित्यिकांचे राजीनामे

By admin | Updated: October 17, 2015 16:07 IST

साहित्यिकांचे राजीनामे हे मोदींविरोधात डाव्यांची असलेली खेळी अशी संभावना व्यंकय्या नायडू यांनी केली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - दादरी हत्या प्रकरण अत्यंत निषेधार्ह असून गुन्हेगारांना कठोर शासन व्हायलाच हवं या शब्दात केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी निषेध व्यक्त केला, मात्र, साहित्यिकांचे राजीनामे हे मोदींविरोधात डाव्यांची असलेली खेळी अशी संभावना केली. आधीच्या सरकारचा वरदहस्त असलेल्या काही साहित्यिकांना नरेंद्र मोदींना मिळालेले प्रचंड बहुमत पचलेले नाही आणि वैचारीक मतभेद असलेल्या या व्यक्ती मिळेल ती संधी साधत मोदी सरकारची बदनामी करत असल्याचा आरोप व्यंकय्या नायडू यांनी सीएनएन आयबीएनशी बोलताना केला. आणिबाणी, शीख हत्याकांड, कलबुर्गींची हत्या, दाभोळकर हत्या यावेळी हे लोक कुठे होते असा सवाल करत त्या त्या वेळी काँग्रेसचे सरकार असल्याने साहित्यिक गप्प राहिल्याचा आरोप नायडूंनी केला.
त्याचप्रमाणे देशाच्या कानाकोप-यात घडणा-या प्रत्येक निषेधार्ह घटनेची दखल पंतप्रधानांनी घ्यायलाच हवी ही मागणी हास्यास्पद असल्याचेही नायडू म्हणाले.
साहित्यिकांचे राजीनामे ही वाईट घटना असल्याचे सांगताना यामुळे केवळ भाजपाचीच नाही तर देशाचीही बदनामी होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अर्थात, देशातली सर्वसामान्य जनता सूज्ञ आहे तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारही चतुर आहेत, त्यांच्यावर अशा भाजपाला जाणुनबुजून लक्ष्य करून करण्यात येत असलेल्या हल्ल्यांचा प्रतिकूल परिणाम होणार नाही अशी आशाही नायडूंनी व्यक्त केली.