शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

सकाळी राजीनामा; सायंकाळी पुन्हा सीएम, नितीश कुमार भाजपच्या साथीने नवव्यांदा मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 06:57 IST

Nitish Kumar: बिहारमध्ये काही दिवसांच्या उलथापालथीनंतर नितीशकुमार यांनी रविवारी सकाळी राजीनामा दिला आणि सायंकाळी नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी ते भाजपच्या साथीने राज्याच्या नव्या एनडीए सरकारचे मुख्यमंत्री झाले आहेत.

- एस. पी. सिन्हापाटणा - बिहारमध्ये काही दिवसांच्या उलथापालथीनंतर नितीशकुमार यांनी रविवारी सकाळी राजीनामा दिला आणि सायंकाळी नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी ते भाजपच्या साथीने राज्याच्या नव्या एनडीए सरकारचे मुख्यमंत्री झाले आहेत. बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी नितीशकुमार यांच्यासह नऊ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

रविवारी राजभवनाच्या राजेंद्र मंडपम येथे संध्याकाळी हा शपथविधी पार पडला. त्यात भाजपच्या कोट्यातून डॉ. प्रेमकुमार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. विजेंद्र यादव, विजयकुमार चौधरी आणि श्रवणकुमार हे जदयूचे असून, त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय ‘हम’ पक्षाचे संतोष सुमन आणि अपक्ष सुमित कुमार सिंह यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीतून जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शपथविधी सोहळ्याला इतर मान्यवरांव्यतिरिक्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे, ‘हम’ पक्षाचे प्रमुख जीतन राम मांझी उपस्थित होते.

एनडीएचे सरकार स्थापन झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाटणा येथील भाजप कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आणि जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. भाजप कार्यकर्त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. 

- मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सकाळी ११ वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपुर्द केला. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जदयू, भाजप आमदार आणि विधान परिषद सदस्यांच्या बैठकीत नितीशकुमार यांची एनडीए विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. 

- नितीशकुमार यांनी पुन्हा राजभवनात जाऊन राज्यपालांना १२८ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र देत नवीन सरकार स्थापण्याचा दावा केला. नितीशकुमार यांनी रविवारी सकाळी जदयूची बैठक घेतली. यामध्ये पक्षाच्या वतीने नितीशकुमार यांना कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते.

जे सरकारमध्ये  हाेते तेच श्रेय घेण्यासाठी स्पर्धा करत होते. आम्हाला त्यांच्यासोबत राहणे योग्य वाटत नव्हते.  - नितीश कुमार  

अजून खेळ संपलेला नाही.  पुढे काय होईल ते पाहा. थकलेल्या मुख्यमंत्र्यांना ढकलत आम्ही काम केले. - तेजस्वी यादव, राजद 

नितीश कुमार  बाहेर जाणार हे माहित हाेते. ‘इंडिया’ अबाधित ठेवण्यासाठी काही बोललो नाही.  - मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस 

पंतप्रधान मोदींकडून ‘गॅरंटी’ मिळाल्यावरच दिला राजीनामा!पाटणा : एनडीए आघाडीपासून फारकत घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर  टीका करणारे नितीश कुमार पंतप्रधान मोदींनी फोन करून ‘गॅरंटी’ (हमी) देईपर्यंत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास गेले नाहीत. सूत्रांनुसार रविवारी सकाळी पंतप्रधान मोदींच्या फोननंतरच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी  सहकारी संजय झा आणि विजेंद्र यादव यांच्यासह राजभवनात जाऊन राजीनामा सादर केला.सूत्रांनुसार, नितीश यांना पंतप्रधान मोदींकडून आश्वासन हवे होते. मोदींचा फोन आल्यानंतर आपण भाजपसोबत गेलो, या समाधानासाठीही त्यांना मोदींचा फोन यावा अशी इच्छा होती. नितीश यांना जदयू नेत्यांना दाखवून द्यायचे होते की त्यांनी पंतप्रधान स्तरावर चर्चा केली, तेव्हाच त्यांनी एनडीएमध्ये सामील होण्याचे मान्य केले. तसेच त्यांना भाजप नेत्यांना संदेश द्यायचा होता की, त्यांचा पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी थेट संपर्क आहे. 

एक फोन अन् सर्व काही बदललेगेल्या वेळी जेव्हा नितीशकुमार यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले तेव्हा भाजपचे अनेक नेते नितीशकुमार यांच्या विरोधात आवाज उठवत होते. भाजप नेत्यांकडून त्यांच्याच सरकारच्या प्रमुखाविरोधातील भाषणबाजी तीव्र झाली होती. यामुळे नितीशकुमार खूप दुखावले गेले आणि शेवटी त्यांनी आरजेडीसोबत जाण्याचा विचार केला. या वेळी भाजप हायकमांडने दिल्ली ते पाटण्यातील भाजप नेत्यांना नितीशकुमार आणि जदयूबाबत कोणतेही वक्तव्य करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते उघडपणे बोलत नसल्याचे टीव्हीवरील वादविवाद आणि अन्य माध्यमांतून स्पष्टपणे दिसून येत होते. यानंतर पंतप्रधान मोदींनी नितीशकुमार यांना फोन केला आणि त्यानंतर सर्व काही बदलले.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा