शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

"आरक्षण म्हणजे दलितांच्या कपाळावरचा कलंक; जे भीकेत दिलेल्या वस्तूसारखं वाटतं...!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 14:17 IST

मांझी म्हणाले, आरक्षणाद्वारे नोकरी मिळालेल्या व्यक्तीकडे नेहमीच हीन भावनेने पाहिले जाते. त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. असे वाटते, की आरक्षण देऊन उपकार केले आहेत. कॉमन स्कूलिंग सिस्टिमनंतर याची गरज राहणार नाही.

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी आरक्षणासंदर्भात एक मोठे वक्तव्य केले आहे. मांझी म्हणाले, आरक्षणामुळे दलितांच्या कपाळावर कलंक लागल्यासारखा झाला आहे, जे भीकेत दिलेल्या वस्तूसारखे वाटू लागले आहे. जर देशात कॉमन स्कूलिंग सिस्टिम लागू करण्यात आली, तर दहा वर्षांनंतर आरक्षणाची गरजच उरणार नाही. जीतनराम हे दिल्लीत येते आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.

मांझी म्हणाले, आरक्षणाद्वारे नोकरी मिळालेल्या व्यक्तीकडे नेहमीच हीन भावनेने पाहिले जाते. त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. असे वाटते, की आरक्षण देऊन उपकार केले आहेत. भीमराव आंबेडकरांनी स्वतःच दहा वर्षांनंतर आरक्षणासंदर्भात समीक्षा करण्यात यावी, असे म्हटले होते, अशी आठवणही जीतनराम मांझी यांनी करून दिली.

'कॉमन स्कूलिंग सिस्टम लागू व्हावी' -जीतनराम मांझी म्हणाले, जगातील इतर अनेक देशांप्रमाणेच भारतातही कॉमन स्कूलिंग सिस्टम लागू व्हायरला हवी. असे झाल्यास आरक्षणाची गरजच भासणार नाही. कॉमन स्कुलिंग व्यवस्थेत राष्ट्रपतींच्या मुलापासून ते दलीत समाजातील मुलांपर्यंत सर्व जण एकाच शाळेत शिकतील. जेणेकरून दोघांनाही समान संधी मिळतील. अशी व्यवस्था निर्माण झाल्यानंतर, दहा वर्षांनी पुन्हा आरक्षणाची आवश्यकता आहे, की नाही, याची समीक्षा करायला हवी. यावेळी स्वतःचे उदाहरण देत मांझी म्हणाले, आपण शिक्षित असल्यामुळेच तर जीवनात उच्च स्थान प्राप्त करू शकलो.

'दुहेरी मतदार प्रणाली लागू  करावी' -दलितांच्या उत्थानासाठी मांझी यांनी आंबेडकरांची दुहेरी मतदार पद्धती लागू करण्याची मागणी केली. मांझी म्हणाले, या व्यवस्थेअंतर्गत दलितांना दुहेरी मतदानाचा अधिकार मिळेल. एक, असे मतदारसंघ निवडले जावेत, जे केवळ दलितांसाठीच आरक्षित असतील आणि तेथे केवळ दलितांनाच मतदानाचा अधिकार असेल. दुसरे म्हणजे, दलितांना आपापल्य मतदारसंघातही सार्वत्रिक निवडणुकांमध्येही सहभाग घेता येईल. यावेळी मांझी यांनी दावा केला की, या प्रणालीद्वारे दलितांचे नेते दलितांच्या मतांनीच निवडून येतील. जेणेकरून त्यांची प्राथमिकता केवळ दलितांचा विकास आणि उन्नती असेल. 

टॅग्स :Biharबिहारreservationआरक्षणPoliticsराजकारण