शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

हिमाचलमध्ये हेलिकॉप्टरद्वारे २० लोकांची सुटका; महिलांनी स्वत: तयार केले हेलिपॅड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 17:05 IST

उत्तराखंडमधील रुद्रप्रयागच्या मध्यमहेश्वर धामच्या दर्शनासाठी आलेले २० ते २५ भाविक अडकले होते.

नवी दिल्ली: हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. या कालावधीत दोन्ही राज्यांमध्ये पावसाशी संबंधित भूस्खलन आणि ढगफुटी संबंधित घटनांमध्ये ८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तसेच येत्या २४ तासांत येथे मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या तीन दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे ९५०हून अधिक रस्ते बंद आहेत.

उत्तराखंडमधील रुद्रप्रयागच्या मध्यमहेश्वर धामच्या दर्शनासाठी आलेले २० ते २५ भाविक अडकले. प्रत्यक्षात मध्यमहेश्वर धाम आणि महामार्गादरम्यान एक पूल होता जो पावसामुळे कोसळल्याने संपर्क तुटला होता. प्रशासनाने हेलिकॉप्टरने बचावकार्य सुरू केले, मात्र धाममध्ये उतरण्याची जागा नव्हती. त्यानंतर ७ हून अधिक स्थानिक महिला पुढे आल्या आणि त्यांनी काही तासांत हेलिपॅड तयार केले. त्यानंतरच अडकलेल्यांची सुटका करण्यात आली.

उत्तराखंडमधील जोशीमठजवळ भूस्खलनात एक घर कोसळले. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. पिपळकोटी ते जोशीमठ दरम्यान बद्रीनाथ महामार्गावरील हेलंग गावात मंगळवारी सायंकाळी उशिरा ही घटना घडली. चमोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चमोली जिल्ह्यातील पिपळकोटी, गडोरा, नवोदय विद्यालय पिपळकोटी, गुलाबकोटी, पागलनाला आणि विष्णुप्रयाग भागात महामार्गाचे नुकसान झाले आहे.

या शहरांना सर्वाधिक धोका आहे

संततधार पावसामुळे हवामान खात्याला सर्वात मोठा धोका हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांना आहे. संचालक सुरेंद्र पाल यांचे म्हणणे आहे की, संततधार पावसामुळे भूस्खलन आणि चिखलाचा धोका असलेल्या शहरांमध्ये शिमला, सोलन, मंडी, कुल्लू, बिलासपूर आणि सिरमौरसह अनेक प्रमुख जिल्हे आणि त्यांच्या शहरांचा समावेश आहे. किंबहुना, डोंगरावर वसलेल्या या शहरांची लोकसंख्या तर वाढतच गेली, पण इथे बांधकामेही मोठ्या प्रमाणात झाली. याशिवाय हिमाचल प्रदेशातील बहुतांश धरणे आणि बॅरेजेस तुडुंब भरल्याने हवामान खात्यालाही चिंता आहे. त्यामुळे डोंगराच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे डोंगरावरील जमिनीतील ओलावा तर वाढेलच पण ती कमकुवत होऊ शकते.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशfloodपूर