शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

Republic Day : राष्ट्रपतींच्या बग्गीबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 09:38 IST

आज भारतामध्ये 26 जानेवारी रोजी 70 वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा केला जात.

आज भारतामध्ये 26 जानेवारी रोजी 70 वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा केला जात. या दिवशी राजधानी नवी दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य सोहळ्याचे आणि संचलनाचे सर्वांनाच आकर्षण असते. राष्ट्रपती या कार्यक्रमासाठी विशेष बग्गीमधून येऊन सहभागी होतात. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती या पदावरुन दुसऱ्यांदा या सोहळ्यासाठी उपस्थित राहाणार आहेत. राष्ट्रपतींच्या बग्गीचा इतिहासही अत्यंत रोचक आहे.

राष्ट्रपती सध्या वापरत असलेली बग्गी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये व्हॉइसरॉय किंवा गव्हर्नर जनरलकडून वापरली जायची. भारत स्वतंत्र झाल्यानंतर फाळणीच्यावेळेस अनेक वस्तू, वास्तूंचीही वाटणी करण्यात आली. गव्हर्नर जनरलच्या सुरक्षारक्षकांची भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 2:1 अशा प्रमाणात विभागणी करण्यात आली. आज त्याला प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड असे म्हटले जाते. 

गव्हर्नर जनरलच्या बग्गीवर दोन्ही देशांनी हक्क सांगितल्यावर तिच्या विभागणीचा प्रश्न उभा राहिला. शेवटी नाणेफेक करुन तिची विभागणी करण्यात आली. गव्हर्नर जनरलच्या सुरक्षादलाच्या कमांडंटनी हा नाणेफेक करुन निर्णय दिला. राष्ट्रपतींच्या या बग्गीला भारतीय आणि ऑस्ट्रेलियन जातीच्या मिश्र संकराचे घोडे वापरले जातात. 1950 साली झालेल्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात या बग्गीला 6 ऑस्ट्रेलियन घोडे जुंपण्यात आले होते. 1984 पर्यंत या बग्गीचा उपयोग राष्ट्रपती करत होते. त्यानंतर तिचा वापर थांबवण्यात आला होता. मात्र माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या काळात तिचा पुन्हा वापर सुरु करण्यात आला.

पहिला प्रजासत्ताक सोहळा-

२६ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी गव्हर्नमेंट हाउसच्या दरबार हाउसमध्ये पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. देशातील पहिली परेड इंडिया गेट आणि राजपथ यांच्यामध्ये न होता, त्याच्या जवळ असलेल्या निर्वान स्टेडियममध्ये निघाली. त्याला आज ‘मे. ध्यानचंद स्टेडियम’ म्हणून ओळखले जाते. त्यादिवशी ध्वजाला ३१ तोफांची सलामी दिली गेली होती, त्यानंतर ध्वज फडकवण्यात आला. पहिला समारोह दुपारनंतर साजरा करण्यात आला. या वेळेस पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद ६ घोड्यांच्या बग्गीतून गव्हर्नमेंट हाउसमधून दुपारी २.३० वाजता निघाले. कॅनॉट प्लेस व ल्यूटेन्स झोन याला फेरी मारत, त्यांची फेरी स्टेडियमच्या आत पोहोचली व ३.४५ वाजता सलामी मंचापर्यंत पोहोचली, तेव्हा तिरंग्याला ३१ तोफांची सलामी देण्यात आली.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनIndiaभारत