शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Republic Day 2022: आतापर्यंत ५ वेळा बदललाय राष्ट्रीय ध्वज; काय आहे ‘तिरंगा’ झेंड्याचा इतिहास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 16:24 IST

History of National Flag; स्वातंत्र्यापूर्वी ७ ऑगस्ट १९०६ रोजी पारसी बागान चौक कोलकाता येथे पहिल्यांदा ध्वज फडकला होता

नवी दिल्ली – भारतात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. घरापासून चौकापर्यंत भारताचा तिरंगा झेंडा फडकताना दिसत आहे. प्रत्येक देशवासिय तिरंग्यावर जेवढं प्रेम करतो तितकचं त्याची प्रतिमा राखण्यासाठी प्रयत्न करत असतो. तिरंग्याची आन-बान-शान राखण्यासाठी आतापर्यंत सीमेवर हजारो सैनिकांनी स्वत:च्या जीवाची बाजी लावली आहे. परंतु या तिरंग्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे का?

सध्या अस्तित्वात असलेला तिरंगा झेंडा २२ जुलै १९४७ रोजी भारतीय संविधान सभेच्या बैठकीत स्वीकारण्यात आला. तेव्हापासून तिरंग्याचं स्वरुप हेच आहे. तिरंगा झेंडा नावानुसार तीन वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या आहेत. ज्यात सर्वात वर केशरी रंग दिसतो तो देशाच्या ताकदीचा आणि ध्यैर्याचं प्रतीक मानलं जातं. त्यानंतर मध्ये सफेद पट्टीसोबत धम्मचक्र दिसतं ते शांती आणि सत्याचं प्रतीक मानलं जातं. तर खाली हिरव्या रंगाचा पट्टा दिसतो तो देशाची समृद्धी, विकास आणि हरितक्रांतीचे प्रतीक मानलं जातं. झेंड्याची रुंदी आणि लांबी अंदाजे २ बाय ३ अशी असते.

स्वातंत्र्यापूर्वी ७ ऑगस्ट १९०६ रोजी पारसी बागान चौक कोलकाता येथे पहिल्यांदा ध्वज फडकला होता. त्यावेळी क्रांतीकाऱ्यांनी राष्ट्रीय ध्वजाचं नाव दिलं होतं. या ध्वजात हिरव्या, पिवळ्या आणि लाल रंगाची पट्टी होती. हिरव्या रंगाच्या पट्टीत कमळाचं फूल होतं. तर पिवळ्या रंगात वंदे मातरम् आणि लाल रंगात चंद्र-सूर्याची प्रतिमा होती. तर देशाचा दुसरा झेंडा पॅरिसमध्ये फडकला होता. परंतु याबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत.

काहींच्या मते, क्रांतीकारी मॅडम कामा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९०७ मध्ये हा झेंडा फडकावला होता. तर काहींच्या मते ही घटना १९०५ मध्ये झाली होती. या ध्वजातील रंग पहिल्या झेंड्याप्रमाणे होते. परंतु त्यातील डिझाईनमध्ये थोडा बदल होता. यातील वरच्या पट्टीत केवळ एक कमळ आणि सात तारे होते जे सप्तऋषी म्हणून ओळखले जातात. हा झेंडा बर्लिनमध्ये झालेल्या समाजवादी संमेलनात अनावरण करण्यात आले होते.

देशाचा तिसरा ध्वज डॉ. अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी १९१७ मध्ये होमरूल आंदोलनादरम्यान फडकवला होता. या ध्वजावर ५ लाल आणि ४ हिरव्या आडव्या पट्ट्या होत्या. यात सप्तर्षीच्या अभिमुखतेमध्ये सात तारे, डाव्या आणि वरच्या बाजूस युनियन जॅक, एका कोपऱ्यात पांढरा चंद्रकोर आणि तारा होता.

आंध्र प्रदेशच्या एका युवकाने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात चौथा ध्वज फडकवला होता. तो महात्मा गांधींना सोपवला होता. हा कार्यक्रम १९२१ रोजी विजयवाडा येथे झाला होता. हा झेंडा लाल, हिरव्या रंगाने बनवला होता. ज्यात देशातील दोन प्रमुख समुह हिंदू आणि मुस्लीम यांना प्रतिनिधित्व दिलं होतं. झेंडा दाखवल्यानंतर गांधींच्या सूचनेनंतर त्यात इतर समुदायाचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी सफेद रंगाची पट्टी आणि एक चरखा जोडण्यात आला. त्यानंतर पाचवा झेंडा पहिल्यांदा राष्ट्रीय ध्वज म्हणून वापरण्यासाठी प्रस्ताव आला. हा झेंडाही आत्ताच्या झेंड्यापेक्षा थोडा वेगळा होता. त्यात अशोक चक्राऐवजी चरखा होता आणि इतर रंग समान होते. हा ध्वज १९३१ मध्ये आणला होता.

तर सहावा तिरंगा ध्वज २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेच्या बैठकीत भारतीय राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारण्यात आला. यात केवळ एकमेव बदल करण्यात आला तो म्हणजे चरख्याऐवजी धम्मचक्र ठेवण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत हाच भारताचा तिरंगा झेंडा सर्व देशातील नागरिकांसाठी अभिमान ठरला आहे. तिरंगा झेंड्याची प्रतिमा उज्ज्वल ठेवण्यासाठी अनेकजण निष्ठेने आदरपूर्वक काम करत असतात.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन