शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अहवाल... भ्रष्टाचाराच्या तक्रारीत देशात गृह खात्याचा पहिला नंबर, नंतर रेल्वे अन् बँका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 13:46 IST

सरकारकडे प्राप्त झालेल्या एकूण तक्रारींपैकी ८५,४३७ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.

केंद्रीय सतर्कता आयोग म्हणजे सीवीसीने वर्षे २०२२ चा अहवाल सादर केला आहे. या अहवालातील माहितीनुसार, गतवर्षी भ्रष्टाचाराच्या सर्वाधिक तक्रारी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध आल्या आहेत. त्यानंतर, अनुक्रमे रेल्वे आणि बँकेतील कर्मचाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. सन २०२२ मध्ये केंद्र सरकारच्या सर्वच विभगांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याविरुद्ध १ लाख १५ हजार २०३ एवढ्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 

सरकारकडे प्राप्त झालेल्या एकूण तक्रारींपैकी ८५,४३७ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही २९,७६६ तक्ररींवर कारवाई किंवा कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामध्ये, २२,०३४ तक्रारी तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ पेंडिंग राहिल्या आहेत. विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्रीय सतर्कता आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी प्रमुख सतर्कता अधिकाऱ्यांसाठी तीन महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. संस्थेच्या बाह्य शाखेंतर्गत हे काम पाहिले जाते. या अहवालानुसार, गतवर्षी गृह मंत्रालयाकडे आपल्या कर्चमाऱ्यांविरुद्ध ४६,६४३ तक्रारी प्राप्त आहेत. तर, रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांविरुद्ध १०,५८० तक्रारी आल्या आहेत. त्यानंतर, तिसरा क्रमांक बँकेतील कर्मचाऱ्यांचा लागतो, त्यांच्याविरुद्ध ८,१२९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 

गृह मंत्रालयातील कर्मचाऱ्यांविरुद्ध एकूण २३,९१९ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. तर, अद्यापही २२,७२४ तक्रारी प्रलंबित आहेत. त्यापैकी, १९१९८ तक्रारी ह्या तीन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून प्रलंबित आहेत. संबंधित विभागाकडून नुकताच यासंदर्भातील अहवाल सार्वजनिक करण्यात आला आहे. त्यानुसार, रेल्वेच्या ९,६६३ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. तर, बँकांच्या ७,७६२ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. रेल्वेच्या ९१७ आणि बँकेच्या ३६७ तक्रारींचा निपटारा करणे अद्यापही बाकी आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खा. सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.  

 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारHome Ministryगृह मंत्रालयCrime Newsगुन्हेगारी