शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

हरवलेल्या व्यक्तींबद्दलच्या तक्रारी एसएमएस, व्हॉटस्अ‍ॅपवरून नोंदवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 03:30 IST

दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश : कालबद्ध कार्यक्रम आखण्याची केली सूचना

खुशालचंद बाहेती नवी दिल्ली : हरवलेल्या व्यक्तींना शोधण्याचा महत्त्वाचा कालावधी तक्रारी नोंदविण्यात होणाऱ्या विलंबातच जातो. तो टाळण्यासाठी व ताबडतोब शोधकार्य सुरू व्हावे म्हणून अशा तक्रारी एसएमएस, व्हॉटस्अ‍ॅप, ई-मेलद्वारे नोंदविण्याचे आदेश दिल्लीउच्च न्यायालयाने दिले आहेत. यासाठी कालबद्ध कार्यक्रम ४ आठवड्यांत सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

घरकाम करणारी महिला गेल्या १४ एप्रिलपासून हरविल्याचे पत्र तिच्या आईने उच्च न्यायालयाला लिहिले. न्यायालयाने पोलिसांना अहवाल मागितला, स्मरणपत्रे दिली. यानंतर २१ मे रोजी पोलिसांनी तक्रार नोंदविली. तक्रार नोंदविण्यात झालेला महिनाभराचा विलंब पाहून न्यायालयाने शोधकार्याचा महत्त्वाचा कालावधी वाया गेल्याचे मत व्यक्त केले. उच्च न्यायालयात हरवलेल्या व्यक्तीबद्दल अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. यात तक्रार नोंदविण्यात आली नाही किंवा ती उशिरा नोंदविण्यात आली होती, असा अनुभव असल्याने अशा तक्रारी एसएमएस, व्हॉटस्अ‍ॅप, ई-मेलने नोंदविण्याची सूचना उच्च न्यायालयाने दिली होती. दिल्ली पोलिसांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला. दिल्ली पोलिसांनी यासाठी एक अ‍ॅप तयार करण्याचेही मान्य केले. याशिवाय दिल्ली पोलिसांच्या वेबसाईटवर अशा तक्रारी नोंदविण्यासाठी लिंक देण्याचेही मान्य केले.

दिल्ली पोलिसांनी अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तत्काळ चौकशी सुरू करण्याची आणि आवश्यक प्रकरणांत तत्काळ गुन्हे नोंदविण्याचीही तयारी दर्शविली आहे. दिल्ली पोलिसांच्या प्रस्तावास मान्यता देतानाच तो कालबद्ध पद्धतीने अमलात आणण्याचे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने १८ वर्षांखालील व्यक्ती हरवल्यास थेट अपहरणाचे गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले. यानंतरही तक्रारी नोंदविण्यात टाळाटाळ करण्यात येत असल्याचा अनुभव लोकांना येत आहे. त्यामुळे हा निर्णय देशभरात लागू झाला तर शोध घेण्याचा महत्त्वाचा काळ वाया जाणार नाही.

दररोज १७४ मुले हरवतात

  • २०१६ पर्यंत १ लक्ष ११ हजार ५६९ मुले हरवली. त्यापेक्षा ५५६२५ मिळालीच नाहीत.
  • संदर्भ : लोकसभा प्रश्न क्रमांक ३९२८ दिनांक २०-३-२०१८.
टॅग्स :delhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालय