शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

हरवलेल्या व्यक्तींबद्दलच्या तक्रारी एसएमएस, व्हॉटस्अ‍ॅपवरून नोंदवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 03:30 IST

दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश : कालबद्ध कार्यक्रम आखण्याची केली सूचना

खुशालचंद बाहेती नवी दिल्ली : हरवलेल्या व्यक्तींना शोधण्याचा महत्त्वाचा कालावधी तक्रारी नोंदविण्यात होणाऱ्या विलंबातच जातो. तो टाळण्यासाठी व ताबडतोब शोधकार्य सुरू व्हावे म्हणून अशा तक्रारी एसएमएस, व्हॉटस्अ‍ॅप, ई-मेलद्वारे नोंदविण्याचे आदेश दिल्लीउच्च न्यायालयाने दिले आहेत. यासाठी कालबद्ध कार्यक्रम ४ आठवड्यांत सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

घरकाम करणारी महिला गेल्या १४ एप्रिलपासून हरविल्याचे पत्र तिच्या आईने उच्च न्यायालयाला लिहिले. न्यायालयाने पोलिसांना अहवाल मागितला, स्मरणपत्रे दिली. यानंतर २१ मे रोजी पोलिसांनी तक्रार नोंदविली. तक्रार नोंदविण्यात झालेला महिनाभराचा विलंब पाहून न्यायालयाने शोधकार्याचा महत्त्वाचा कालावधी वाया गेल्याचे मत व्यक्त केले. उच्च न्यायालयात हरवलेल्या व्यक्तीबद्दल अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. यात तक्रार नोंदविण्यात आली नाही किंवा ती उशिरा नोंदविण्यात आली होती, असा अनुभव असल्याने अशा तक्रारी एसएमएस, व्हॉटस्अ‍ॅप, ई-मेलने नोंदविण्याची सूचना उच्च न्यायालयाने दिली होती. दिल्ली पोलिसांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला. दिल्ली पोलिसांनी यासाठी एक अ‍ॅप तयार करण्याचेही मान्य केले. याशिवाय दिल्ली पोलिसांच्या वेबसाईटवर अशा तक्रारी नोंदविण्यासाठी लिंक देण्याचेही मान्य केले.

दिल्ली पोलिसांनी अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तत्काळ चौकशी सुरू करण्याची आणि आवश्यक प्रकरणांत तत्काळ गुन्हे नोंदविण्याचीही तयारी दर्शविली आहे. दिल्ली पोलिसांच्या प्रस्तावास मान्यता देतानाच तो कालबद्ध पद्धतीने अमलात आणण्याचे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने १८ वर्षांखालील व्यक्ती हरवल्यास थेट अपहरणाचे गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले. यानंतरही तक्रारी नोंदविण्यात टाळाटाळ करण्यात येत असल्याचा अनुभव लोकांना येत आहे. त्यामुळे हा निर्णय देशभरात लागू झाला तर शोध घेण्याचा महत्त्वाचा काळ वाया जाणार नाही.

दररोज १७४ मुले हरवतात

  • २०१६ पर्यंत १ लक्ष ११ हजार ५६९ मुले हरवली. त्यापेक्षा ५५६२५ मिळालीच नाहीत.
  • संदर्भ : लोकसभा प्रश्न क्रमांक ३९२८ दिनांक २०-३-२०१८.
टॅग्स :delhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालय