शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

'‘चुकार’ न्यायाधीशांच्या बदल्या करणे हा प्रभावी उपाय नाहीच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 02:40 IST

न्या. चंद्रचूड यांचे मत; काही मध्यम मार्ग काढावा लागेल

नवी दिल्ली : उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध गैरवर्तनाच्या तक्रारी आल्यास अशा न्यायाधीशांची अन्यत्र बदली करणे हा न्यायसंस्था उत्तरदायी बनविण्याचा प्रभावी उपाय नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले.न्या. चंद्रचूड म्हणाले की, ‘चुकार’ न्यायाधीशांच्या संदर्भात राज्यघटनेत महाभियोग आणि बदली असे दोन मार्ग आहेत. यापैकी महाभियोगाचा मार्ग अपवादाने स्वीकारला जातो व अद्यापपर्यंत एकदाही यशस्वी झालेला नाही. त्या तुलनेत बदली करण्याचा मार्ग जास्त वेळा अनुसरला जात असला तरी इच्छित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तोही प्रभावी उपाय नाही.प्रा. टॉम गिन्सबर्ग आणि अझीझ झेड. हक यांनी लिहिलेल्या ‘हाऊ टू सेव्ह ए कॉन्स्टिट्यूशनल डेमॉक्रसी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात मंगळवारी रात्री ते बोलत होते. मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्या. विजया कापसे ताहिलरामाणी यांची मेघालयला बदली होणे व ती न स्वीकराता न्या. ताहिलरामाणी यांनी राजीनामा देणे यावरून टीका होत असताना ‘कॉलेजियम’चे सदस्य असलेल्या न्या. चंद्रचूड यांनी हे भाष्य केले आहे.स्वायत्तता आवश्यकचन्यायसंस्थेचे उत्तरदायित्व व स्वायत्तता यांच्यात योग्य समन्वय ठेवण्यावरही त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, न्यायसंस्थेच्या स्वायत्ततेमध्ये ही यंत्रणा अजिबात उत्तरदायी नसणे बिलकुल अभिप्रेत नाही. न्यायसंस्थेला निखालस खोट्या आरोपांपासून संरक्षण देण्यासाठी स्वायत्तता गरजेची आहे.हल्ली प्रत्येक महत्त्वाच्या निकालानंतर खास करून समाजमाध्यमांतून न्यायाधीशांवर व्यक्तिगत टीका होत असते; पण न्यायाधीश याला उत्तर देऊ शकत नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे. ज्येष्ठ वकील अरविंद पी. दातार यांचेही यावेळी भाषण झाले. लोकशाही टिकवून ठेवण्यात न्यायसंस्थेची भूमिका महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालय