शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
2
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
3
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
4
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
5
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
6
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
7
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
8
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
9
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
10
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
11
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
12
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
13
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
14
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
15
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
16
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
17
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
18
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
19
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
20
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!

'‘चुकार’ न्यायाधीशांच्या बदल्या करणे हा प्रभावी उपाय नाहीच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 02:40 IST

न्या. चंद्रचूड यांचे मत; काही मध्यम मार्ग काढावा लागेल

नवी दिल्ली : उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध गैरवर्तनाच्या तक्रारी आल्यास अशा न्यायाधीशांची अन्यत्र बदली करणे हा न्यायसंस्था उत्तरदायी बनविण्याचा प्रभावी उपाय नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले.न्या. चंद्रचूड म्हणाले की, ‘चुकार’ न्यायाधीशांच्या संदर्भात राज्यघटनेत महाभियोग आणि बदली असे दोन मार्ग आहेत. यापैकी महाभियोगाचा मार्ग अपवादाने स्वीकारला जातो व अद्यापपर्यंत एकदाही यशस्वी झालेला नाही. त्या तुलनेत बदली करण्याचा मार्ग जास्त वेळा अनुसरला जात असला तरी इच्छित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तोही प्रभावी उपाय नाही.प्रा. टॉम गिन्सबर्ग आणि अझीझ झेड. हक यांनी लिहिलेल्या ‘हाऊ टू सेव्ह ए कॉन्स्टिट्यूशनल डेमॉक्रसी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात मंगळवारी रात्री ते बोलत होते. मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्या. विजया कापसे ताहिलरामाणी यांची मेघालयला बदली होणे व ती न स्वीकराता न्या. ताहिलरामाणी यांनी राजीनामा देणे यावरून टीका होत असताना ‘कॉलेजियम’चे सदस्य असलेल्या न्या. चंद्रचूड यांनी हे भाष्य केले आहे.स्वायत्तता आवश्यकचन्यायसंस्थेचे उत्तरदायित्व व स्वायत्तता यांच्यात योग्य समन्वय ठेवण्यावरही त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, न्यायसंस्थेच्या स्वायत्ततेमध्ये ही यंत्रणा अजिबात उत्तरदायी नसणे बिलकुल अभिप्रेत नाही. न्यायसंस्थेला निखालस खोट्या आरोपांपासून संरक्षण देण्यासाठी स्वायत्तता गरजेची आहे.हल्ली प्रत्येक महत्त्वाच्या निकालानंतर खास करून समाजमाध्यमांतून न्यायाधीशांवर व्यक्तिगत टीका होत असते; पण न्यायाधीश याला उत्तर देऊ शकत नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे. ज्येष्ठ वकील अरविंद पी. दातार यांचेही यावेळी भाषण झाले. लोकशाही टिकवून ठेवण्यात न्यायसंस्थेची भूमिका महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालय