शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

'‘चुकार’ न्यायाधीशांच्या बदल्या करणे हा प्रभावी उपाय नाहीच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 02:40 IST

न्या. चंद्रचूड यांचे मत; काही मध्यम मार्ग काढावा लागेल

नवी दिल्ली : उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध गैरवर्तनाच्या तक्रारी आल्यास अशा न्यायाधीशांची अन्यत्र बदली करणे हा न्यायसंस्था उत्तरदायी बनविण्याचा प्रभावी उपाय नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले.न्या. चंद्रचूड म्हणाले की, ‘चुकार’ न्यायाधीशांच्या संदर्भात राज्यघटनेत महाभियोग आणि बदली असे दोन मार्ग आहेत. यापैकी महाभियोगाचा मार्ग अपवादाने स्वीकारला जातो व अद्यापपर्यंत एकदाही यशस्वी झालेला नाही. त्या तुलनेत बदली करण्याचा मार्ग जास्त वेळा अनुसरला जात असला तरी इच्छित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तोही प्रभावी उपाय नाही.प्रा. टॉम गिन्सबर्ग आणि अझीझ झेड. हक यांनी लिहिलेल्या ‘हाऊ टू सेव्ह ए कॉन्स्टिट्यूशनल डेमॉक्रसी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात मंगळवारी रात्री ते बोलत होते. मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्या. विजया कापसे ताहिलरामाणी यांची मेघालयला बदली होणे व ती न स्वीकराता न्या. ताहिलरामाणी यांनी राजीनामा देणे यावरून टीका होत असताना ‘कॉलेजियम’चे सदस्य असलेल्या न्या. चंद्रचूड यांनी हे भाष्य केले आहे.स्वायत्तता आवश्यकचन्यायसंस्थेचे उत्तरदायित्व व स्वायत्तता यांच्यात योग्य समन्वय ठेवण्यावरही त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, न्यायसंस्थेच्या स्वायत्ततेमध्ये ही यंत्रणा अजिबात उत्तरदायी नसणे बिलकुल अभिप्रेत नाही. न्यायसंस्थेला निखालस खोट्या आरोपांपासून संरक्षण देण्यासाठी स्वायत्तता गरजेची आहे.हल्ली प्रत्येक महत्त्वाच्या निकालानंतर खास करून समाजमाध्यमांतून न्यायाधीशांवर व्यक्तिगत टीका होत असते; पण न्यायाधीश याला उत्तर देऊ शकत नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे. ज्येष्ठ वकील अरविंद पी. दातार यांचेही यावेळी भाषण झाले. लोकशाही टिकवून ठेवण्यात न्यायसंस्थेची भूमिका महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालय