शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

'न्याय' योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने नीती आयोगाचे उपाध्यक्ष अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 09:55 IST

नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनीही राहुल गांधींच्या न्याय योजनेच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र या वक्तव्यामुळे राजीव कुमार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - राहुल गांधी यांनी निवडणूक जिंकल्यास गरिबांना दरमहा ठरावीक आर्थिक मदत देणारी 'न्याय' योजना लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. राहुल गांधींच्या या घोषणेवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. दरम्यान, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनीही राहुल गांधींच्या न्याय योजनेच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र या वक्तव्यामुळे राजीव कुमार अडचणीत आले आहेत.  राजीव कुमार यांचे हे वक्तव्य म्हणजे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे मानले असून, त्यासंदर्भात स्पष्टीकरण मागवण्या आले आहे.  नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी केलेली टिप्पणी म्हणजे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे निवडणूक आयोगाने मान्य केले आहे. ''काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कुठलाही विचार न करता न्याय योजनेची घोषणा केली. या योजनेचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिमाण होईल. केवळ निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस काहीही घोषणा करत आहे. राहुल गांधींची न्याय योजना लागू झाल्यास देश 4 पाऊले मागे जाईल,'' असेही राजीव कुमार यांनी म्हटले  होते.  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन न्याय योजनेची घोषणा केली होती. देशात काँग्रेसचे सरकार आल्यास गरिबांना सन्मानाने जगता यावे, यासाठी किमान मासिक उत्पन्न 12 हजार रुपये असणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यासाठी काँग्रेस सरकार न्याय योजना लागू करेल. त्यामुळे देशातील 20 टक्केपेक्षा अधिक कुटुबांना याचा लाभ होऊन देशातील गरिबी दूर होईल, असे राहुल गांधींनी सांगितले होते.  मात्र निवडणूक आयोग या प्रकाराकडे वेगळ्या नजरेने पाहत आहे. टिप्पणी एका राजकीय पक्षाने दुसऱ्या राजकीय पक्षावर किंवा नेत्यावर केलेली टिप्पणी नाही. त्यामुळे याला निवडणूक आचारसंहितेचा भंग मानला जाऊ शकतो. दरम्यान, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी राहुल गांधी यांनी केलेली घोषणा म्हणजे कधीही पूर्ण होऊ न शकणारे आश्वासन आहे, असे म्हटले होते.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRahul Gandhiराहुल गांधीNIti Ayogनिती आयोगPoliticsराजकारण