शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

Delhi Election: धार्मिक कटुतेला लोकांनी ठोकरले; भाजपच्या पराभवाची मालिका सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 08:17 IST

दिल्लीच्या निकालावर शरद पवार यांची प्रतिक्रिया : समविचारी पक्षांनी एकत्र यावे

पुणे/मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीमधे आम आदमी पार्टीला (आप) लोकांनी पुन्हा संधी देऊन विकासाला मत दिले असून, धार्मिक कटुता पसरविणाऱ्या प्रचाराला ठोकरले आहे. भारतीय जनता पार्टी ही आपत्ती असल्याचे लोकांना पटले असून त्यांच्या पराभवाची मालिका थांबेल असे वाटत नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य करताना ते म्हणाले, केजरीवाल यांनी वीजबिल, पाणीपट्टी, शिक्षणपद्धतीत सुधारणेसाठी घेतलेल्या निर्णयाला मतदारांनी साथ दिली. हा निकाल म्हणजे अहंकाराला दिलेली चपराक आहे. शाहीनबागमधे जे सुरू होते, ते पाहता भाजपाचा पराभव निश्चितच होता.

भाजपाने धार्मिक कटुता वाढेल याची जाणीवपूर्क काळजी घेतली. ‘त्यांना मारा, त्यांना गोळी घाला...’ अशा घोषणाही दिल्या गेल्या. मात्र लोकांनी ते मान्य केले नाही. दिल्लीवासीयांनी दिलेला कौल हा केवळ त्या राज्यापुरता मर्यादित नाही. इतर राज्यातही त्याचे पडसाद उमटतील. त्यामुळे भाजपाची पराभवाची मालिका थांबेल असे वाटत नाही. आता आम्हा लोकांची जबाबदारी आहे. इथून पुढे किमान समान कार्यक्रम घेऊन काम करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

देशातील समविचारी पक्षांचे नेते मिळून याविषयी नक्कीच विचार करू. भाजपामध्येही मोदी-शहा यांच्याबद्दल दहशत आहे. त्याच पक्षातील खासदारांना ‘तुमचे कसे चालले आहे’ असे विचारले असता, तेही इकडे-तिकडे बघून कोणी ऐकत नसल्याचीखबरदारी घेऊन बोलतात. संसदेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत दहशतीचे वातावरण असल्याचे जाणवते, असेहीे पवार यांनी सांगितले.प्रादेशिक पक्षांची वाढती ताकदपंजाबसह उत्तरेतील काही राज्ये आणि दक्षिणेत तमिळनाडू, ओरिसामध्ये भाजपाला पर्यायी पक्षांची ताकद वाढत आहे. डाव्यांचीही ताकद वाढत आहे.च्महाराष्ट्रात झालेला प्रयोग आपल्याकडे व्हावा अशी लोकांची इच्छा आहे. लोकांना एकसमान विचाराचा कार्यक्रम मांडण्याची अपेक्षा आहे.च्देशभरातच हा विचार दिसून येत आहे. त्यामुळे त्या विरोधात एकत्र येण्याची लोकभावना असल्याचेही पवार यांनी सांगितले.राज ठाकरेंना गांभीर्यानेघेण्याची गरज नाहीराज ठाकरे यांनी नुकताच हिंदुत्वाचा मुद्दा घेत भगवा झेंडा हाती घेतला आहे. या बदललेल्या भूमिकेवरही शरद पवार यांनी टीका केली. काही लोक भाषण पहायला येतात. काही लोक बघायला येतात. मात्र, त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांची भाषणे म्हणजे करमणूक असल्याचे पवार यांनी नमूद केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी घेतलेली जाहीर भूमिका महाआघाडीला पूरक होती.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाAAPआप