शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

व्होडाफोन, एअरटेलविरोधात जिओची तक्रार; शेतकरी आंदोलनाचे पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 06:55 IST

कंपन्यांकडून अनैतिक मार्गांचा अवलंब

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी जिओचे सिमकार्ड इतर कंपन्यांकडे हस्तांतरित करण्याचे आवाहन करण्यात आल्यामुळे जिओला मोठा फटका बसला असून, याप्रकरणी जिओने दूरसंचार नियामक ‘ट्राय’कडे व्हाेडाफोन इंडिया आणि एअरटेल यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. या दोन्ही कंपन्या अनैतिक मार्गांचा अवलंब करून जिओविरुद्ध अफवा पसरवीत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी बिलांच्या विरोधात पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.  नव्या कृषी कायद्यांमुळे रिलायन्स उद्योगसमूहास फायदा होणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे रिलायन्सच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचा फटका जिओला बसला असून, जिओची सिमकार्ड‌्स इतर कंपन्यांकडे हस्तांतरित (पोर्ट) करून घेण्याच्या विनंत्या जिओला हजारोंच्या संख्येने मिळत आहेत. या सर्व प्रकारामागे व्होडाफोन इंडिया आणि एअरटेल यांचा थेट हात असल्याचा आरोप जिओने केला आहे. नव्या कृषी कायद्यांचा रिलायन्सला फायदा होणार असल्याची अफवा व्होडाफोन इंडिया आणि एअरटेल यांनी पसरविली असल्याचा आरोप जिओने केला आहे. दोन्ही कंपन्यांनी फेटाळले आरोपव्होडाफोन इंडिया आणि एअरटेल यांनी जिओचे आरोप फेटाळून लावले आहेत. एअरटेलने ट्रायला सादर केलेल्या पत्रात म्हटले आहे की, एअरटेल मागील २५ वर्षांपासून दूरसंचार क्षेत्रात सचोटीने व्यवसाय करीत आहे. काही स्पर्धकांनी चिथावणीखोर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, दादागिरीचे हातखंडे वापरले तरीही एअरटेलने संयम दाखवून आपले स्पर्धक आणि भागीदारांचा योग्य तो सन्मानच केला. आमच्या विरोधातील तक्रार फेटाळून लावण्याच्याच लायकीची आहे. ही तक्रार अभिरुचीहीन आणि अश्लाघ्य आहे.

टॅग्स :Vodafoneव्होडाफोनReliance Jioरिलायन्स जिओAirtelएअरटेल