शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

व्होडाफोन, एअरटेलविरोधात जिओची तक्रार; शेतकरी आंदोलनाचे पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 06:55 IST

कंपन्यांकडून अनैतिक मार्गांचा अवलंब

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी जिओचे सिमकार्ड इतर कंपन्यांकडे हस्तांतरित करण्याचे आवाहन करण्यात आल्यामुळे जिओला मोठा फटका बसला असून, याप्रकरणी जिओने दूरसंचार नियामक ‘ट्राय’कडे व्हाेडाफोन इंडिया आणि एअरटेल यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. या दोन्ही कंपन्या अनैतिक मार्गांचा अवलंब करून जिओविरुद्ध अफवा पसरवीत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी बिलांच्या विरोधात पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.  नव्या कृषी कायद्यांमुळे रिलायन्स उद्योगसमूहास फायदा होणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे रिलायन्सच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचा फटका जिओला बसला असून, जिओची सिमकार्ड‌्स इतर कंपन्यांकडे हस्तांतरित (पोर्ट) करून घेण्याच्या विनंत्या जिओला हजारोंच्या संख्येने मिळत आहेत. या सर्व प्रकारामागे व्होडाफोन इंडिया आणि एअरटेल यांचा थेट हात असल्याचा आरोप जिओने केला आहे. नव्या कृषी कायद्यांचा रिलायन्सला फायदा होणार असल्याची अफवा व्होडाफोन इंडिया आणि एअरटेल यांनी पसरविली असल्याचा आरोप जिओने केला आहे. दोन्ही कंपन्यांनी फेटाळले आरोपव्होडाफोन इंडिया आणि एअरटेल यांनी जिओचे आरोप फेटाळून लावले आहेत. एअरटेलने ट्रायला सादर केलेल्या पत्रात म्हटले आहे की, एअरटेल मागील २५ वर्षांपासून दूरसंचार क्षेत्रात सचोटीने व्यवसाय करीत आहे. काही स्पर्धकांनी चिथावणीखोर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, दादागिरीचे हातखंडे वापरले तरीही एअरटेलने संयम दाखवून आपले स्पर्धक आणि भागीदारांचा योग्य तो सन्मानच केला. आमच्या विरोधातील तक्रार फेटाळून लावण्याच्याच लायकीची आहे. ही तक्रार अभिरुचीहीन आणि अश्लाघ्य आहे.

टॅग्स :Vodafoneव्होडाफोनReliance Jioरिलायन्स जिओAirtelएअरटेल