शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

मतपत्रिका वापरण्याची मागणी फेटाळली; ईव्हीएमच्या दुरुपयोगाची शक्यता अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 09:10 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकांचा वापर करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकांचा वापर करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. एका संस्थेने ही याचिका केली होती. ईव्हीएमचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्भय व निष्पक्ष वातावरणात निवडणुका घेता येणार नाहीत, असे या याचिकेत म्हटले होते.

ते म्हणणे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाला पटले नाही. प्रत्येक यंत्रणेचा व यंत्रांचा चांगला व वाईट वापर होण्याची शक्यता असते. असा संशय प्रत्येक क्षेत्रात घेता येऊ शकेल, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. १९९९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतात ईव्हीएमचा वापर सर्वप्रथम झाला. त्याआधी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये मतपत्रिकांचा वापर करण्यात येत असे. मतपत्रिकांची पळवापळवी करून प्रतिस्पर्धी उमेदवाराला जेरीस आणण्याचे डावपेच रचले जात. प्रसंगी त्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचारही होत असे.गैरप्रकार आटोक्यातईव्हीएमचा वापर सुरू झाल्यापासून मतपत्रिकांमुळे होणारे गैरप्रकार आटोक्यात आले. मात्र पराभूत उमेदवार ईव्हीएमला दोष देऊ लागले. ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड होतो, या यंत्रात हवे तसे बदल करवून सत्ताधारी पक्ष निवडणुकांत विजय मिळवितात, असे आरोप काही राजकीय पक्षांनी केले. ईव्हीएमचा वापर बंद करून पुन्हा मतपत्रिका आणाव्यात, या मागणीसाठी काहींनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. असाच विरोध आता व्हीव्हीपॅट यंत्रांनाही होत आहे.

टॅग्स :Courtन्यायालय