शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

कर्जप्रवाह सुव्यवस्थित करा, देशातील सरकारी बॅँकांना दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 03:01 IST

निर्मला सीतारामन : देशातील सरकारी बॅँकांना दिले निर्देश

नवी दिल्ली : देशातील कर्जप्रवाह सुव्यवस्थित करा, असे निर्देश केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दिले आहेत. व्यवसायांना गरजेनुसार कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, असे त्यांनी म्हटले आहे. कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर देशातील आर्थिक घडामोडी घटून अर्ध्यावर आल्या आहेत. त्यामुळे यंदा कर्जवृद्धी घसरण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर वित्तमंत्र्यांनी या सूचना केल्या आहेत.

सीतारामन यांनी सरकारी मालकीच्या बँकांच्या प्रमुखांची एक बैठक घेतली. याप्रसंगी त्यांनी छोट्या व्यवसायांना नुकत्याच जाहीर झालेल्या आपत्कालीन कर्ज सुविधा हमी योजनेंतर्गत (ईसीएलजीएस) कर्ज देण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना बँकांना दिल्या. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, पात्र सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना कर्ज देणे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी यापुढे सुरूच ठेवायला हवे. इतर व्यवसायांच्या कर्ज गरजांची पूर्तताही बँकांनी करायला हवी.ईसीएलजीएस ही योजना केंद्र सरकारने कोविड-१९ साथीसाठी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या वित्तीय पॅकेजचा भाग आहे. या योजनेंतर्गत व्यवसायांना विनातारण कर्ज देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, भाडे आणि पुनर्साठा यासाठी ही कर्जे दिली जातील. या योजनेंतर्गत बँका आणि बिगर-बँक वित्तीय संस्थांना थकहमी देण्यात आली आहे. छोट्या व्यावसायिकांचे कर्ज थकल्यास त्यावर बँकांना १०० टक्के हमी मिळणार आहे. छोट्या व्यावसायिकांना कर्ज देण्यासाठी बँकांना प्रोत्साहन लाभ देण्याचीही तरतूद योजनेत असल्याचे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.बॅँकांनी दिलेल्या कर्जाचा आढावाव्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध बँकांनी दिलेल्या कर्जाचा आढावा घेतला. तसेच ईसीएलजीएसअंतर्गत मंजूर झालेली कर्जे, संभाव्य लाभधारक, संपर्क करणाऱ्यांची संख्या, वितरित झालेली कर्जे इत्यादी बाबींचे विश्लेषणदेखील केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय