शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

President Draupadi Murmu Speech : देशातील प्रादेशिक असमानतेत घट - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 06:01 IST

Independence Day : राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या की, देशात आर्थिक सुधारणांबरोबरच समाजाच्या कल्याणासाठी नावीन्यपूर्ण  योजना राबविण्यात येत आहेत.

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत नवभारताचा उद्य झाला आहे. भारताने कोरोना साथीचा ज्या समर्थपणे मुकाबला केला त्यातून हे दिसून आले. देशातील प्रादेशिक असमानता कमी होऊ लागली आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी म्हटले आहे. 

७६व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी त्यांनी जनतेला उद्देशून संदेश दिला. राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या की, देशात आर्थिक सुधारणांबरोबरच समाजाच्या कल्याणासाठी नावीन्यपूर्ण  योजना राबविण्यात येत आहेत. जागतिक स्तरावरील विविध प्रवाहांवर मात करून देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांचे राष्ट्रपती मुर्मु यांनी कौतुक केले. 

राष्ट्रपती मुर्मु यांनी सांगितले की, भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशातील गरिबी, निरक्षरतेच्या मोठ्या प्रमाणामुळे इथे लोकशाही व्यवस्था रुजेल की नाही याविषयी विविध देशांचे नेते, तज्ज्ञ यांच्या मनात अनेक शंका होत्या. मात्र त्या साऱ्या शंका भारतीयांनी खोट्या ठरविल्या. भारतामध्ये लोकशाही व्यवस्था केवळ रुजलीच नाही तर विकसितही झाली. 

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूIndependence Dayस्वातंत्र्य दिन