शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

करकपात केल्यानंतर खाद्यतेलाच्या किमतीत घट; प्रति लीटर ४ ते ७ रुपयांचा ग्राहकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 13:15 IST

प्रति लीटर ४ ते ७ रुपयांचा ग्राहकांना दिलासा

नवी दिल्ली : पेट्राेल आणि डिझेलसाेबतच खाद्यतेलाच्या किमतीमध्येही गेल्या काही महिन्यांमध्ये माेठी वाढ झालेली दिसून आली. खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमतींपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने करकपातीचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे थाेक बाजारात तेलाच्या किमतींमध्ये ४ ते ७  रुपयांनी घट झाली आहे. त्यात आणखी घट हाेण्याची अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने शुक्रवारी कच्चे साेयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील कृषी अधिभार १५ टक्क्यांनी कमी केला. तसेच कच्च्या पाम तेलावरील कृषी अधिभारही ७.५ टक्क्यांवर आणला. याशिवाय या तेलांवरील किमान कर शून्य टक्के केला आहे.  कर कपातीनंतर कच्च्या पाम तेलावरील प्रभावी कर ८.२५ तर साेयाबीन आणि सूर्यफूल तेलांवरील कर ५.५ टक्के हाेणार आहे. खाद्यतेलांवरील आयातशुल्काचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. तसेच माेहरीच्या तेलाचे वायदेबाजारातील व्यवहार स्थगित करण्यात आले आहेत. 

सरकारच्या निर्णयानंतर खाद्यतेलाची विक्री करणाऱ्या कंपन्यांनी खाद्य तेलाच्या थाेक किमतींमध्ये ४ ते ७ रुपये प्रतिलिटर एवढी कपात केली आहे. खाद्यतेलांच्या किमती भडकल्यानंतर त्याविरोधात ओरड सुरू झाल्याने सरकारने खाद्यतेलांवरील आयात करामध्ये कपात केली. त्यामुळे किमती काही प्रमाणात खाली आल्या. त्यानंतरही पुन्हा किमतींमध्ये कपात झाल्याने ऐन दिवाळीत खाद्यतेल काहीसे स्वस्त झाले होते. आता पुन्हा किमती कमी झाल्या आहेत. आता तेलबिया बाजारात आल्या असून, तेलाचे उत्पादन वाढू लागणार आहे. त्यामुळेही किमती काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सरकारच्या सूत्रांनी सांगितले, की खाद्यतेलाच्या किमती गेल्यावर्षीच्या तुलनेत अजूनही जास्त आहेत. मात्र, सध्या त्यात घट हाेताना दिसत आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढलेल्या असूनही सरकारच्या उपाययाेजनांचा परिणाम हाेत आहे. 

टॅग्स :Indiaभारत