शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
5
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
6
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
7
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
8
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
9
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
10
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
11
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
12
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
13
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
14
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
15
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
16
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
17
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
18
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
19
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
20
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?

जम्मू काश्मीरमध्ये अद्यापही फडकतोय 'लाल झेंडा'; अधिकाऱ्यांनी दिलं 'हे' धक्कादायक उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 11:57 IST

केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर तिरंगा झेंडा कायम ठेऊन इतर झेंडा उतरविणं गरजेचे आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटविल्याच्या निर्णयाला 48 तासांहून अधिक वेळ झाला आहे. मात्र अद्यापही जम्मू काश्मीरातील सरकारी कार्यालयांवर राज्याचा ध्वज फडकताना दिसत आहे. येथील सचिवालय भवनाच्या इमारतीवर तिरंग्यासोबत जम्मू काश्मीरचा लाल झेंडा फडकतानाचं चित्र आहे. 

कलम 370 हटविल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं होतं की, जम्मू काश्मीरमध्ये आता वेगळा झेंडा फडकणार नाही तसेच येथील लोकांसाठी दुहेरी नागरिकत्व असणार नाही. जम्मू काश्मीरचं पूनर्रचना विधेयक आणून लडाख हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यात आला आहे. तसेच अन्य राज्यांप्रमाणे जम्मू काश्मीर येथेही दर 5 वर्षांनी विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. 

केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर तिरंगा झेंडा कायम ठेऊन इतर झेंडा उतरविणं गरजेचे आहे. मात्र सचिवालय भवनाने अद्याप लाल झेंडा उतरविला नाही. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, अद्याप आम्हाला आदेश प्राप्त झाले नाहीत. आदेश मिळाल्यानंतर सरकारी कार्यालयांवरील लाल झेंडे उतरविण्यात येतील आणि तिरंगा झेंडा फडकविण्यात येईल. 

सर्वात आधी माजी विधानसभा अध्यक्ष निर्मल सिंह यांनी सरकारी गाडीवरुन लाल झेंडा काढून टाकला. भाजपा नेते निर्मल सिंह यांनी सांगितले की, जर जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाला असेल तर अन्य झेंड्याची गरज आता भासणार नाही. दरम्यान काश्मीर खोऱ्यात शांतता राखण्यासाठी 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. अनेक राजकीय नेत्यांवर बारीक लक्ष ठेवलं गेलं आहे.  

कलम 370 रद्द केल्यानंतर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कलम 370 रद्द करण्याबाबतचे फायदे सांगितले. देशाची सर्वोच्च संसद कायदे बनवत होती. मात्र, कल्पना करू शकत नाही की हे कायदे देशाच्या एका भागाला लागूच होत नव्हते. याचप्रमाणे आधीच्या आणि आपल्या सरकारने राबविलेल्या योजनाही जम्मू काश्मीरला लागू होत नव्हती. येथील नागरिक यामुळेच विकासापासून वंचित राहत होते. शिक्षणातील आरक्षण, नोकऱ्या, विविध योजना या नागरिकांना मिळत नव्हत्या. यामुळे हे कलम रद्द झाल्याने या जनतेचा फायदाच होणार आहे. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370