शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रायबल’ कर्मचारी भरती, बदलीचे गैरव्यवहार विधिमंडळात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 17:58 IST

आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत सात प्रकल्प कार्यालयांतील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची भरती, पदोन्नती, प्रतिनियुक्ती व बदल्यांमध्ये झालेला गैरव्यवहार विधिमंडळात पोहचला आहे.

 - गणेश वासनिक 

अमरावती - आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत सात प्रकल्प कार्यालयांतील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची भरती, पदोन्नती, प्रतिनियुक्ती व बदल्यांमध्ये झालेला गैरव्यवहार विधिमंडळात पोहचला आहे. आ. वैभव पिचड यांनी तारांकित प्रश्न क्रमांक १२२५७ अन्वये गैरव्यवहाराबाबत शासनाला जाब विचारला आहे.अमरावती ‘एटीसी’ अंतर्गत धारणी, अकोला, किनवट, पुसद, औरंगाबाद, कळमनुरी व पांढरकवडा या सात प्रकल्प कार्यालयांतर्गत सन २०१८- २०१९ या वर्षात तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु या भरतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. मात्र, याबाबत चौकशी करण्यात आली अथवा नाही, याबाबत अमरावती अपर आयुक्तांच्या कारभारावर आक्षेप घेण्यात आला. पदोन्नती, प्रतिनियुक्ती आणि बदल्यांमध्येदेखील गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अमरावती अपर आयुक्तांनी नियम डावलून भरती प्रक्रिया केल्याबाबत शासनाकडे तक्रारी देण्यात आल्या आहेत. परंतु शासनाने याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, शासनाने पत वाचविण्यासाठी दोषी अधिकारी, कर्मचाºयांना अभय देण्याचा प्रताप चालविला आहे. भरती, पदोन्नती, प्रतिनियुक्ती आणि बदल्यांमध्ये सर्रास आर्थिक व्यवहार झाले असताना याप्रकरणी चौकशी न करण्याचे कारण काय, अमरावती अपर आयुक्तांनी याबाबत दखल का घेतली नाही, असे एक ना अनेक प्रश्न आ. वैभव पिचड यांनी तारांकितच्या माध्यमातून उपस्थित केले आहे. आ. वैभव पिचड यांनी सादर केलेल्या तारांकित प्रश्नांच्या अनुषंगाने शासनाचे अवर सचिव गोविंद माईणकर यांनी आदिवासी विकास विभागाला अमरावती अपर आयुक्त कार्यालयातून तातडीने ई-मेलद्वारे माहिती मागविली आहे. 

 भरतीवर ‘एसीबी’चे होते लक्ष्यआदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयाने सात प्रकल्प कार्यालय स्तरावर यावर्षी राबविलेल्या तृतीय व चतूर्थ श्रेणीच्या भरती प्रकियेकडे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे लक्ष्य होते. तथापि, भरती प्रक्रिया संबंधित अधिका-यांनी अतिशय गोपनीयरित्या हाताळली. त्याकरिता विशेष दलाल देखील नियुक्त करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे यंदाच्या भरती प्रक्रियेत काही ठराविक अधिका-यांचे ‘अच्छे दिन’ आल्याचे बोलले जात आहे.

 कर्मचा-यांचे बदलीनंतरही सेटींगअमरावती ‘एटीसी’अंतर्गत धारणी, अकोला, किनवट, पुसद, औरंगाबाद, कळमनुरी व पांढरकवडा या सात प्रकल्प कार्यालयांतर्गत कर्मचा-यांची बदली झाल्यानंतरही ती रद्द करण्यासाठी ‘सेटींग’ सुरू असल्याचे चित्र आहे. गैरसोयीच्या ठिकाणी झालेली बदली रद्द करून ती सोयीच्या ठिकाणी मिळावी, यासाठी कर्मचारी अपर आयुक्त कार्यालयाच्या पाय-या झिजवित आहे. काही कर्मचा-यांनी सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी पैसे दिले. तथापि, त्याठिकाणी बदली झाली नाही. त्यामुळे दिलेली रक्कम परत मिळण्यासाठी कर्मचारी येरझारा मारत आहेत. यंदा विनंती अर्जानुसार १६१, तर प्रशासकीय ८९ कर्मचाºयांच्या बदल्या झाल्या आहेत.

टॅग्स :Employeeकर्मचारीAmravatiअमरावती