शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

‘ट्रायबल’ कर्मचारी भरती, बदलीचे गैरव्यवहार विधिमंडळात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 17:58 IST

आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत सात प्रकल्प कार्यालयांतील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची भरती, पदोन्नती, प्रतिनियुक्ती व बदल्यांमध्ये झालेला गैरव्यवहार विधिमंडळात पोहचला आहे.

 - गणेश वासनिक 

अमरावती - आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत सात प्रकल्प कार्यालयांतील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची भरती, पदोन्नती, प्रतिनियुक्ती व बदल्यांमध्ये झालेला गैरव्यवहार विधिमंडळात पोहचला आहे. आ. वैभव पिचड यांनी तारांकित प्रश्न क्रमांक १२२५७ अन्वये गैरव्यवहाराबाबत शासनाला जाब विचारला आहे.अमरावती ‘एटीसी’ अंतर्गत धारणी, अकोला, किनवट, पुसद, औरंगाबाद, कळमनुरी व पांढरकवडा या सात प्रकल्प कार्यालयांतर्गत सन २०१८- २०१९ या वर्षात तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु या भरतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. मात्र, याबाबत चौकशी करण्यात आली अथवा नाही, याबाबत अमरावती अपर आयुक्तांच्या कारभारावर आक्षेप घेण्यात आला. पदोन्नती, प्रतिनियुक्ती आणि बदल्यांमध्येदेखील गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अमरावती अपर आयुक्तांनी नियम डावलून भरती प्रक्रिया केल्याबाबत शासनाकडे तक्रारी देण्यात आल्या आहेत. परंतु शासनाने याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, शासनाने पत वाचविण्यासाठी दोषी अधिकारी, कर्मचाºयांना अभय देण्याचा प्रताप चालविला आहे. भरती, पदोन्नती, प्रतिनियुक्ती आणि बदल्यांमध्ये सर्रास आर्थिक व्यवहार झाले असताना याप्रकरणी चौकशी न करण्याचे कारण काय, अमरावती अपर आयुक्तांनी याबाबत दखल का घेतली नाही, असे एक ना अनेक प्रश्न आ. वैभव पिचड यांनी तारांकितच्या माध्यमातून उपस्थित केले आहे. आ. वैभव पिचड यांनी सादर केलेल्या तारांकित प्रश्नांच्या अनुषंगाने शासनाचे अवर सचिव गोविंद माईणकर यांनी आदिवासी विकास विभागाला अमरावती अपर आयुक्त कार्यालयातून तातडीने ई-मेलद्वारे माहिती मागविली आहे. 

 भरतीवर ‘एसीबी’चे होते लक्ष्यआदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयाने सात प्रकल्प कार्यालय स्तरावर यावर्षी राबविलेल्या तृतीय व चतूर्थ श्रेणीच्या भरती प्रकियेकडे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे लक्ष्य होते. तथापि, भरती प्रक्रिया संबंधित अधिका-यांनी अतिशय गोपनीयरित्या हाताळली. त्याकरिता विशेष दलाल देखील नियुक्त करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे यंदाच्या भरती प्रक्रियेत काही ठराविक अधिका-यांचे ‘अच्छे दिन’ आल्याचे बोलले जात आहे.

 कर्मचा-यांचे बदलीनंतरही सेटींगअमरावती ‘एटीसी’अंतर्गत धारणी, अकोला, किनवट, पुसद, औरंगाबाद, कळमनुरी व पांढरकवडा या सात प्रकल्प कार्यालयांतर्गत कर्मचा-यांची बदली झाल्यानंतरही ती रद्द करण्यासाठी ‘सेटींग’ सुरू असल्याचे चित्र आहे. गैरसोयीच्या ठिकाणी झालेली बदली रद्द करून ती सोयीच्या ठिकाणी मिळावी, यासाठी कर्मचारी अपर आयुक्त कार्यालयाच्या पाय-या झिजवित आहे. काही कर्मचा-यांनी सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी पैसे दिले. तथापि, त्याठिकाणी बदली झाली नाही. त्यामुळे दिलेली रक्कम परत मिळण्यासाठी कर्मचारी येरझारा मारत आहेत. यंदा विनंती अर्जानुसार १६१, तर प्रशासकीय ८९ कर्मचाºयांच्या बदल्या झाल्या आहेत.

टॅग्स :Employeeकर्मचारीAmravatiअमरावती