शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

आता ४ वर्षांसाठी लष्करी जवानांची भरती; केंद्र आणणार नवीन योजना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 06:55 IST

Recruitment of Army : ‘अग्निपथ भरती योजने’स केंद्रीय मंत्रिमंडळाकडून लवकरच मंजुरी दिली जाऊ शकते. त्यासाठी शनिवारी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

नवी दिल्ली :भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांच्या जवानांची भरती करण्यासाठी नवीन ‘अग्निपथ भरती योजना’ आणण्याचा विचार केंद्र सरकारने चालविला असून या धोरणाला मंजुरी मिळाल्यास लष्करी जवानांना ४ वर्षांसाठीच भरती केले जाऊ शकते. 

‘अग्निपथ भरती योजने’स केंद्रीय मंत्रिमंडळाकडून लवकरच मंजुरी दिली जाऊ शकते. त्यासाठी शनिवारी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. तथापि, या बैठकीचा कोणताही तपशील रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाला नाही.सरकारशी संबंधित उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, अतिरिक्त सचिव लेफ्ट. जन. अनिल पुरी यांच्या नेतृत्वाखाली लष्करी व्यवहार मंत्रालयाने यासंबंधीची योजना तयार केली आहे. तिचे सादरीकरण सरकारसमोर केले जाणार आहे. 

प्रारंभिक तयारीनुसार, अग्निपथ योजनेत भरती झालेल्या जवानांना ६ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यांना अग्निवीर असे संबोधले जाईल. त्यातील २० ते २५ टक्के जवानांना दीर्घकालीन सेवा दिली जाईल. उरलेल्या जवानांना ४ वर्षांनंतर निवृत्त केले जाईल. निवृत्त होताना त्यांना १० ते १२ लाख रुपयांचा सेवा खंडण लाभ दिला जाईल. सर्व काही नियोजनानुसार पार पडल्यास अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची भरती आगामी ३ ते ४ महिन्यांत सुरू होऊ शकते. काही विशिष्ट कामासाठी तज्ज्ञांची भरती करण्याच्या पर्यायावरही संरक्षण दले विचार करीत आहेत. कोविड-१९ साथीच्या काळात संरक्षण दलांची भरती बंद होती. 

नागरी नोकऱ्यांत जवानांना प्राधान्य४ वर्षांनंतर लष्करातून निवृत्त होणाऱ्या जवानांना नागरी नोकऱ्यांत प्राधान्य दिले जाईल. त्यासाठी सरकार त्यांना साह्य करेल. काही खासगी कंपन्यांनी त्यांना नोकऱ्या देण्याचे मान्य केले असल्याचे समजते. त्यांच्या रूपाने कंपन्यांना लष्करी शिस्तीतील मनुष्यबळ उपलब्ध होईल, ही या योजनेची एक जमेची बाजू आहे, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान