शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

चुकीच्या अटकेने होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी शिफारशी;सीआरपीसीत सुधारणा हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 02:24 IST

खोट्या गुन्ह्यात गोवल्यावने वा बेकायदेशीर अटकेमुळे कैदेत राहाव्या लागणा-या व्यक्तीस पुढे निर्दोष सिद्ध झाला तरी त्याला कैदेपूर्वीप्रमाणे सामान्य आयुष्य जगणे शक्य नसते.

- खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : खोट्या गुन्ह्यात गोवल्यावने वा बेकायदेशीर अटकेमुळे कैदेत राहाव्या लागणा-या व्यक्तीस पुढे निर्दोष सिद्ध झाला तरी त्याला कैदेपूर्वीप्रमाणे सामान्य आयुष्य जगणे शक्य नसते. त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ जेलमध्ये जातो. त्यामुळे त्याचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी शासनाची आहे. यासाठी कायद्यात तरतूद नसल्याने तशी तरतूद सी.आर.पी.सी.मध्ये संशोधनाद्वारे करावी, अशी शिफारस विधि आयोगाने केंद्र सरकारला केली आहे.सध्या न्यायालये व मानवाधिकार आयोग दोषी अधिकारी व सरकारला नुकसान भरपाई देण्याचे आदेश देतात. परंतु या आयोगाच्या शिफारशी सरकारवर बंधनकारक असल्याची तरतूद कायद्यात नाही. त्यामुळे २०१५-१६ मध्ये आयोगाने केलेल्या ३३२ पैकी २२९ म्हणजे ६९ टक्के शिफारशींची पूर्तता झालीच नाही. त्यामुळे विशेष कायद्याची गरज असल्याचे विधि आयोगाने म्हटले आहे.३० नोव्हेंबर २०१७ मध्ये अशाच एका प्रकरणात दिल्ली न्यायालयाने बेकायदा गुन्ह्यात गोवण्यामुळे होणाºया परिणामांचा अभ्यास केला होता. याचा व्यापक अभ्यास करून केंद्र सरकराला शिफारस करण्याची विनंती विधि आयोगाला केली होती. त्यानंतर आयोगाने सी.आर.पी.सी.त सुधारणा करण्याची शिफारस केली आहे.यात चुकीचा खटला, खोटा जाब नोंदवणे, बनावट पुरावे तयार करणे, खोटी साक्ष देणे, पुरावा नष्ट करणे, बेकायदा डांबून ठेवणे, कायद्याचे पालन न करता होणारा तपास याविरोधात दाद मागण्याची तरतूद केली आहे. या तक्रारींसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक न्यायालय असावे, नुकसानभरपाईचा अर्ज मिळाल्यानंतर वर्षाच्या आत त्यावर निर्णय घ्यावा, असेही सुचविले आहे. नुकसानभरपाई देताना गुन्ह्याचे गांभीर्य, शारीरिक, मानसिक व आर्थिक हानी, कौटुंबिक आयुष्याचे नुकसान, गमावलेल्या शैक्षणिक व उत्पन्नविषयक संधी याचा विचार करून रक्कम निश्चित करण्याची तरतूदही यात आहे.2015 मध्ये देशातील तुरुंगांत 419623 कैद्यांपैकी ६७ टक्के म्हणजे 282076 कच्चे कैदी.जेलमध्ये राहिल्यानंतर निर्दोष सुटलेले कैदी 82582 अपिलात सुटलेले आरोपी 23442विधि आयोगाने काय सुचविले?1 प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायालय.2 पीडित व्यक्ती किंवा त्याचे वारसदार, अधिकृत प्रतिनिधी तक्रार करू शकतील.3 पीडित जेथे राहतो तेथे किंवा घटना घडली तेथील कोर्टात अर्ज करता येईल.4 अर्ज निकाली निघेपर्यंत २५ ते ५० हजार अंतरिम भरपाईची तरतूद.5 व्याजासह नुकसानभरपाईची तरतूद.6 विशेष न्यायालय दोषी अधिकाºयाविरुद्ध कारवाईची शिफारस करू शकेल.

टॅग्स :Arrestअटक