शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

‘आयुष्मान’ वयोमर्यादा ७० ऐवजी ६० वर्षे करण्याची शिफारस; काय आहे योजना? कुणाला मिळतो लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 06:51 IST

जास्तीत जास्त लोकांना या आरोग्यविषयक योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने खासदार रामगोपाल यादव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या शिफारशी केल्या आहेत.

नवी दिल्ली : मोफत वैद्यकीय उपचारांची सुविधा असलेल्या आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रतेची वयोमर्यादा ७० ऐवजी ६० वर्षे करण्यात यावी आणि  आर्थिक मदतीची रक्कम ५ ऐवजी १० लाख रुपये करण्यात यावी, अशी शिफारस आरोग्य व कुटुंब कल्याणविषयक विशेष समितीने केली आहे. जास्तीत जास्त लोकांना या आरोग्यविषयक योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने खासदार रामगोपाल यादव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या शिफारशी केल्या आहेत.

काय आहे योजना?आयुष्मान भारत ही जगातील सर्वांत मोठी विमा योजना असून देशातील ४० टक्के गरीब लोकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांची यात तरतूद आहे. या योजनेत निवडक सरकार व खासगी रुग्णालयांत उपचारांची सुविधा असून भरती होण्यापूर्वी १० दिवस आणि नंतरच्या वाहतुकीसह इतर खर्चाची तरतूद या योजनेत आहे. ४.५ कोटी कुटुंबातील ७० वर्षांवरील ६ कोटी नागरिकांना केंद्र सरकारने या योजनेतून संरक्षण दिले आहे.

लाभ कोणाला?ग्रामीण भागात राहणारे नागरिकअनुसूचित जाती-जमातीचे आणि आदिवासी लोकअसंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार  दारिद्र्यरेषेखालील लोकरोजंदारीवर काम करणारा कामगारकुटुंबात कोणी दिव्यांग असल्यासया योजनेला प. बंगालसह अनेक राज्यांनी विरोध करीत आपल्या राज्यांच्या योजना चालवल्या आहेत. 

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतHealthआरोग्य